अ‍ॅपशहर

वालधुनीवरील पूल कोसळला

३० वर्षांपूर्वी वालधुनी नदीवर बांधलेला वडोल गावचा पूल बुधवारी सायंकाळी कोसळला. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र गावाचा उल्हासनगर शहराशी संपर्क तुटला आहे. आयुक्तांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Times 22 Sep 2016, 3:00 am
उल्हासनगर : ३० वर्षांपूर्वी वालधुनी नदीवर बांधलेला वडोल गावचा पूल बुधवारी सायंकाळी कोसळला. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र गावाचा उल्हासनगर शहराशी संपर्क तुटला आहे. आयुक्तांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bridge of valdhuni river collapse
वालधुनीवरील पूल कोसळला


उल्हासनगर कॅम्प ३ येथील सम्राट अशोक नगर आणि वडोल गाव यांच्यामधून वालधुनी नदी वाहते. या भागात एक हजार लोकसंख्या असून, वडोल गावाला उल्हासनगर शहराशी जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. तो जर्जर झाल्यामुळे उपमहापौर पंचशीला नाना पवार यांनी नवीन पूल बंधण्याची मागणी उल्हासनगर महापालिकेकडे केली होती. त्या मागणीवरून पालिकेने निविदा प्रक्रिया राबवत मे महिन्यात ए. एम. रामचंदानी या कंपनीला पुलाचे काम दिले होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू न केल्याचे उपमहापौर पंचशिला पवार यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज