म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता पालघर जिल्हा प्रशासनाकडूनही जमीन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये २६ गावांमधील ५९ हेक्टर जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केली जाणार असून त्यासाठी शेतकरी आणि जमीन मालकांशी संवाद साधण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. तर दोन गावांमधील जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यामध्ये जागेचा मार्ग निश्चित करण्यात आल्यानंतर जिल्हास्तरीय समितीद्वारे या संदर्भातील मोबदला ठरवून त्यानंतर जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केली जाणार आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या (एनएचसीआरसीएल) माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी जमीन संपादनाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. जमीन संपादनापूर्वीच या भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असून जमीन मालकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे या भागातील भू संपादनाला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून आस्ते कदम प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांचा आणि जमीन मालकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. जिल्हा समितीकडून ठरवलेल्या रकमेच्या चौपट अधिक रक्कम मिळणार असल्यामुळे नागरिकांचा विरोध राहणार नाही. सध्या शेतकऱ्यांशी सकारात्मक प्रतिसाद असून अवघ्या साडेसतरा मीटर रुंदीच्या जमिनीच्या पट्ट्यातून बुलेट ट्रेन धावू शकणार असल्याची माहिती, पालघर उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी विकास गजरे यांनी दिली.
पालघरमधील २६ गावांचा समावेश…
टेंभी खोडावे, जलसार, मिठागर, विपाथन बुद्रुक, शिल्टे, मांडे, विराथन खुर्द, रामबाग, माकुणसार, रोठे, केळवे रोड, कमारे, वरखुंटी, नवली, मोरवली, वेवूर, अंबाडी, घोलविरा, शेलवाडी, नंदोरे, पडघे, कल्लोळे, खानीवडे, वाळवे, शिरगांव, हनुमाननगर या गावांमधील ५९.०९१३ हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जंगल, कॅनल, नाले, गावठाण, गुरचरण, पाडे, डेअरी डेव्हलमपमेंट, रेल्वे बी क्लास जमिनीचा समावेश आहे. याशिवाय बोईसर भागामध्ये बुलेटला थांबा मिळणार असून त्या भागातील माण परिसराचा समावेश असून तेथील जमीनीचे अद्याप सर्वेक्षण सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता पालघर जिल्हा प्रशासनाकडूनही जमीन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये २६ गावांमधील ५९ हेक्टर जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केली जाणार असून त्यासाठी शेतकरी आणि जमीन मालकांशी संवाद साधण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. तर दोन गावांमधील जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यामध्ये जागेचा मार्ग निश्चित करण्यात आल्यानंतर जिल्हास्तरीय समितीद्वारे या संदर्भातील मोबदला ठरवून त्यानंतर जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केली जाणार आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या (एनएचसीआरसीएल) माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी जमीन संपादनाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. जमीन संपादनापूर्वीच या भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असून जमीन मालकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे या भागातील भू संपादनाला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून आस्ते कदम प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांचा आणि जमीन मालकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. जिल्हा समितीकडून ठरवलेल्या रकमेच्या चौपट अधिक रक्कम मिळणार असल्यामुळे नागरिकांचा विरोध राहणार नाही. सध्या शेतकऱ्यांशी सकारात्मक प्रतिसाद असून अवघ्या साडेसतरा मीटर रुंदीच्या जमिनीच्या पट्ट्यातून बुलेट ट्रेन धावू शकणार असल्याची माहिती, पालघर उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी विकास गजरे यांनी दिली.
पालघरमधील २६ गावांचा समावेश…
टेंभी खोडावे, जलसार, मिठागर, विपाथन बुद्रुक, शिल्टे, मांडे, विराथन खुर्द, रामबाग, माकुणसार, रोठे, केळवे रोड, कमारे, वरखुंटी, नवली, मोरवली, वेवूर, अंबाडी, घोलविरा, शेलवाडी, नंदोरे, पडघे, कल्लोळे, खानीवडे, वाळवे, शिरगांव, हनुमाननगर या गावांमधील ५९.०९१३ हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जंगल, कॅनल, नाले, गावठाण, गुरचरण, पाडे, डेअरी डेव्हलमपमेंट, रेल्वे बी क्लास जमिनीचा समावेश आहे. याशिवाय बोईसर भागामध्ये बुलेटला थांबा मिळणार असून त्या भागातील माण परिसराचा समावेश असून तेथील जमीनीचे अद्याप सर्वेक्षण सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.