म. टा. वृत्तसेवा, ठाणे
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकाही उमेदवाराने न दाखल केलेला उमेदवारी अर्ज, शिवनेसेसह मनसेनेही घेतलेली माघार यामुळे डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याचे दिसून येते. सुरुवातीला सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उत्सुक असल्याने राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षातर्फे साई शिवाजी शेलार यांचीच उमेदवारी आहे.
केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४६चे भाजपचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे ४ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या प्रभागात १९ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. सुरुवातीला सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत होते. रविवारी दुपारी भाजपतर्फे शिवाजी शेलार यांचे सुपुत्र साई शेलार यांनी आपला अर्ज दाखल केला. मात्र गुरुवारपर्यंत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे दिसते. सुद्धार्थ शेलार यांनीही डमी अर्ज यापूर्वी भरला होता, मात्र तो मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे अधिक स्पष्ट झाले. शिवाजी शेलार यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीकडे हे पद यावे, अशी भूमिका शिवसेनेसह मनसेनेही घेतल्याने त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नव्हते. याबाबत निवडणूक आयोगातर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्षांनी माघार घेतल्याने साई शेलार यांच्याकडे सुत्रे जाण्याची शक्यता आहे. शिवाजी शेलार यांचीही निवड बिनविरोध झाली होती. त्यांच्या पश्चात साई शेलार यांचीही बिनविरोध निवड होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात दिसून येते.
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकाही उमेदवाराने न दाखल केलेला उमेदवारी अर्ज, शिवनेसेसह मनसेनेही घेतलेली माघार यामुळे डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याचे दिसून येते. सुरुवातीला सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उत्सुक असल्याने राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षातर्फे साई शिवाजी शेलार यांचीच उमेदवारी आहे.
केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४६चे भाजपचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे ४ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या प्रभागात १९ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. सुरुवातीला सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत होते. रविवारी दुपारी भाजपतर्फे शिवाजी शेलार यांचे सुपुत्र साई शेलार यांनी आपला अर्ज दाखल केला. मात्र गुरुवारपर्यंत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे दिसते. सुद्धार्थ शेलार यांनीही डमी अर्ज यापूर्वी भरला होता, मात्र तो मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे अधिक स्पष्ट झाले. शिवाजी शेलार यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीकडे हे पद यावे, अशी भूमिका शिवसेनेसह मनसेनेही घेतल्याने त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नव्हते. याबाबत निवडणूक आयोगातर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्षांनी माघार घेतल्याने साई शेलार यांच्याकडे सुत्रे जाण्याची शक्यता आहे. शिवाजी शेलार यांचीही निवड बिनविरोध झाली होती. त्यांच्या पश्चात साई शेलार यांचीही बिनविरोध निवड होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात दिसून येते.