अ‍ॅपशहर

सोनसाखळी चोरांना लगाम

सोनसाखळी चोऱ्या आटोक्यात आणण्यात ठाणे पोलिस यशस्वी झाले असल्याचे आशादायी चित्र आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१५मध्ये सोनसाखळी चोरीचे ८४३ गुन्हे घडले होते. तर, २०१६ मधील गुन्ह्यांची संख्या ३६२वर आली आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असले तरी, क्षणार्धात अंगावरील दागिने खेचणाऱ्या चोरट्यांची भीती आजही कायम आहे. केवळ विषय काढला तरी मनात धडकी भरते, असे महिलांचे म्हणणे आहे.

Maharashtra Times 14 Jan 2017, 3:00 am
२०१५च्या तुलनेत घटनांना आवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cases of chain snaching decreased
सोनसाखळी चोरांना लगाम


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

सोनसाखळी चोऱ्या आटोक्यात आणण्यात ठाणे पोलिस यशस्वी झाले असल्याचे आशादायी चित्र आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१५मध्ये सोनसाखळी चोरीचे ८४३ गुन्हे घडले होते. तर, २०१६ मधील गुन्ह्यांची संख्या ३६२वर आली आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असले तरी, क्षणार्धात अंगावरील दागिने खेचणाऱ्या चोरट्यांची भीती आजही कायम आहे. केवळ विषय काढला तरी मनात धडकी भरते, असे महिलांचे म्हणणे आहे.

रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून चोरटे बाइकवरून पसार होतात. पाठलाग करून चोरट्यांना पकडणे शक्य होत नाही. अनेकदा झटापटीत महिलांचा जीवही धोक्यात येतो. २०१५मध्ये जून महिन्यात ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयासमोर एका ४९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चेन खेचली. चोरटे बाइकवरून पळत असताना या धाडसी महिलेने बाइकवरील एका चोरट्याचा शर्ट पकडला. ही महिला बाइकबरोबर २५ फूट फरफटत जाऊनही तिने चोरट्याला सोडले नव्हते. यात त्या जखमी झाल्या होत्या. मॉर्निंग वाकला जाणाऱ्या महिलांनाही चोरटे टार्गेट करत असल्याने ब्रह्माण्ड परिसरातील महिलांनी सकाळी दागिनेच न घालण्याचा निर्णय घेतला आहे.

एखाद्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्यास चोरटे दुसऱ्या ठिकाणी चोऱ्या करतात आणि पोलिसांना चकवा देत सोनसाखळी चोऱ्या करतात. ठाणे पोलिसांचे खास सोनसाखळी चोरीविरोधी पथकही कार्यरत आहे.

आशादायी चित्र
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१२ मध्ये ५६९ तर २०१३ मध्ये ८०८, २०१४ मध्ये सोनसाखळी चोरीच्या ९७६ घटना घडल्या आहेत. तर २०१५ मध्ये या गुन्ह्यात किंचितशी घट होत ८४३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर २०१६ मध्ये तर सोनसाखळी चोरींच्या गुन्ह्यात कमालीची घट झाल्याचे दिसत आहे. त्या वर्षात एकूण ३६२ गुन्हे घडले आहेत.

ठाण्यात सर्वाधिक घटना
मागील दोन वर्षांत ठाणे शहरात सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक ५०५ घटना घडलेल्या आहेत. ठाण्यात परिमंडळ १ आणि ५ असे दोन परिमंडळ आहे. तर परिमंडळ २ भिवंडी मध्ये ६९, परिमंडळ ३ कल्याणमध्ये ४२९ आणि परिमंडळ ४ उल्हासनगर मध्ये २०२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडलेले असल्याचे समोर आले आहे.

दोन हजार गुन्हे उकलीच्या प्रतीक्षेत
पाच वर्षात एकूण ३ हजार ५५८ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून यापैकी १ हजार ४९४ गुन्ह्यांची उकल होऊ शकली आहे. अद्याप २ हजार ६४ गुन्हे उकलीच्या प्रतीक्षेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज