खासगी डॉक्टर - आरोग्य विभागाचा परस्परविरोधी दावा
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
निम्मा जून उलटला, तरी एक-दोनदा तुरळक हजेरी लावून गायब झालेल्या पावसामुळे सर्दी, तापाच्या रुग्णांत काही प्रमाणात वाढ झाली आहे. खासगी डॉक्टरांकडून या रुग्णांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाल्याचे निदान केले जात असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मात्र अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच डेंग्यू, मलेरियाचे निदान केले जाते. या रुग्णांचा अशा प्रकारे अहवाल प्राप्त झालेला नाही, शिवाय परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या नसल्यामुळे मलेरिया, डेंग्यूची साथ नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांचा आरोग्य विभाग आजही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत आहे. या भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली अनधिकृत बांधकामे, कचऱ्याची समस्या, यामुळे आजारांचा फैलाव होण्यास बराच वाव आहे. घारीवली गावात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातल्याचे निदान खासगी डॉक्टरांकडून करण्यात आले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य विभागाने या भागाची पाहणी केली असता डेंग्यूच्या अळ्या परिसरात सापडल्या नसल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे खासगी डॉक्टराकडून मात्र रुग्णांवर डेंग्यूच्या आजाराचे निदान करत त्या दृष्टीने औषधोपचार केले जात असल्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम आहे. मात्र या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
एकही रुग्ण नाही
याबाबत पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ग्रामीण भागात आणि शहरातदेखील एकही डेंग्यूचा रुग्ण आढळलेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
निम्मा जून उलटला, तरी एक-दोनदा तुरळक हजेरी लावून गायब झालेल्या पावसामुळे सर्दी, तापाच्या रुग्णांत काही प्रमाणात वाढ झाली आहे. खासगी डॉक्टरांकडून या रुग्णांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाल्याचे निदान केले जात असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मात्र अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच डेंग्यू, मलेरियाचे निदान केले जाते. या रुग्णांचा अशा प्रकारे अहवाल प्राप्त झालेला नाही, शिवाय परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या नसल्यामुळे मलेरिया, डेंग्यूची साथ नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांचा आरोग्य विभाग आजही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत आहे. या भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली अनधिकृत बांधकामे, कचऱ्याची समस्या, यामुळे आजारांचा फैलाव होण्यास बराच वाव आहे. घारीवली गावात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातल्याचे निदान खासगी डॉक्टरांकडून करण्यात आले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य विभागाने या भागाची पाहणी केली असता डेंग्यूच्या अळ्या परिसरात सापडल्या नसल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे खासगी डॉक्टराकडून मात्र रुग्णांवर डेंग्यूच्या आजाराचे निदान करत त्या दृष्टीने औषधोपचार केले जात असल्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम आहे. मात्र या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
एकही रुग्ण नाही
याबाबत पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ग्रामीण भागात आणि शहरातदेखील एकही डेंग्यूचा रुग्ण आढळलेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्यावी, असे आवाहन केले.