म. टा. वृत्तसेवा, ठाणे
काही दिवसांवर आलेल्या होळी सणानिमित्त चरसची तस्करी करण्यात येत असल्याची बाब ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून समोर आली. ठाणे आणि भिवंडीतून दोघांना अटक करून ९०० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी उत्तर प्रदेशमधून हे चरस आणले असले तरी या तस्करीचे कनेक्शन नेपाळ असल्याचे आरोपींच्या चौकशीतून निष्पन्न झाले. या आरोपींना ठाणे न्यायालयाने २७ फेबुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
सलमान शहा जमीन अहमद शाह (२०) आणि शिवकुमार शर्मा (३२) अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे असून भिवंडीत राहतात. होळी सणानिमित्त चरसची विक्री करण्यासाठी आरोपी ठाण्यातील तलावपाळी परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सापळा लावून सलामानला पकडण्यात आले. त्याच्याकडून १ लाख ८० रुपयांचे चरस हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. सलमान हा फेरीवाला असून चरसच्या विक्रीतून त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. चरस आणले कोठून, याबाबत त्याच्याकडे चौकशी करत असताना शिवकुमार याचे नाव समोर आले. त्यानेच हे चरस सलमानला दिले होते. शिवकुमार हा तीन ते चार दिवसांपूर्वी चरस घेऊन आला होता. त्यानुसार ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाने तत्काळ शिवकुमारला देखील अटक केली. या दोघांच्याही चौकशीत या गुन्ह्याचे धागेदोरे नेपाळपर्यंत पसरले असल्याचे समोर आले.
भारताच्या सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नेपाळमध्ये बहादूरगंज नावाचे गाव आहे. या गावातील एकाने हे चरस शिवकुमारला दिले. बहादूरगंजमध्ये गांजाची शेती केली जात असून चरसही तयार होत असल्याचे ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले. नेपाळमधील हा आरोपी मागणीनुसार अंमली पदार्थ पुरवतो. या आरोपीचा शोध घेतला जात असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. शिवकुमारचे गावी सलूनचे दुकान असून दोन्ही आरोपींकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. होळी सण काही दिवसांवर आला आहे. या सणासाठी भांग बनवली जाते. त्यामध्ये चरस मिसळले जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही दिवसांवर आलेल्या होळी सणानिमित्त चरसची तस्करी करण्यात येत असल्याची बाब ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून समोर आली. ठाणे आणि भिवंडीतून दोघांना अटक करून ९०० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी उत्तर प्रदेशमधून हे चरस आणले असले तरी या तस्करीचे कनेक्शन नेपाळ असल्याचे आरोपींच्या चौकशीतून निष्पन्न झाले. या आरोपींना ठाणे न्यायालयाने २७ फेबुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
सलमान शहा जमीन अहमद शाह (२०) आणि शिवकुमार शर्मा (३२) अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे असून भिवंडीत राहतात. होळी सणानिमित्त चरसची विक्री करण्यासाठी आरोपी ठाण्यातील तलावपाळी परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सापळा लावून सलामानला पकडण्यात आले. त्याच्याकडून १ लाख ८० रुपयांचे चरस हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. सलमान हा फेरीवाला असून चरसच्या विक्रीतून त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. चरस आणले कोठून, याबाबत त्याच्याकडे चौकशी करत असताना शिवकुमार याचे नाव समोर आले. त्यानेच हे चरस सलमानला दिले होते. शिवकुमार हा तीन ते चार दिवसांपूर्वी चरस घेऊन आला होता. त्यानुसार ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाने तत्काळ शिवकुमारला देखील अटक केली. या दोघांच्याही चौकशीत या गुन्ह्याचे धागेदोरे नेपाळपर्यंत पसरले असल्याचे समोर आले.
भारताच्या सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नेपाळमध्ये बहादूरगंज नावाचे गाव आहे. या गावातील एकाने हे चरस शिवकुमारला दिले. बहादूरगंजमध्ये गांजाची शेती केली जात असून चरसही तयार होत असल्याचे ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले. नेपाळमधील हा आरोपी मागणीनुसार अंमली पदार्थ पुरवतो. या आरोपीचा शोध घेतला जात असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. शिवकुमारचे गावी सलूनचे दुकान असून दोन्ही आरोपींकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. होळी सण काही दिवसांवर आला आहे. या सणासाठी भांग बनवली जाते. त्यामध्ये चरस मिसळले जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.