अ‍ॅपशहर

​ बालदिनी प्लास्टिकबंदीचा संदेश

प्लास्टिक प्रदूषणामुळे शहरे, समुद्र किनारे बकाल झाले असल्याने ‘करूया प्लास्टिकबंदी - वापरू पेपर रद्दी’ असा संदेश नेहरू जयंतीनिमित्त दिव्यांग बालमित्रांनी सुजाण नागरिकांना दिला.

Maharashtra Times 15 Nov 2017, 4:01 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम childrens day no plastic
​ बालदिनी प्लास्टिकबंदीचा संदेश


वसई येथील अभंग भवनमध्ये जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने बालदिन साजरा करण्यात आला.

प्लास्टिक प्रदूषणामुळे शहरे, समुद्र किनारे बकाल झाले असल्याने ‘करूया प्लास्टिकबंदी - वापरू पेपर रद्दी’ असा संदेश नेहरू जयंतीनिमित्त दिव्यांग बालमित्रांनी सुजाण नागरिकांना दिला. प्लास्टिकबंदी हा विषय चर्चेचा नसून कृतीचा आहे. म्हणूनच अभंग मध्ये वर्तमानपत्राच्या रद्दीपासून कागदी बॅग व कापडी पिशव्या बनविण्याचे काम दिव्यांग मुले करीत आहेत, असे अभंग भवनाच्या संचालिका सिंथिया बॅप्टिस्टा यांनी सांगितले. ‘सकाळी घेतलेले वर्तमानपत्र सायंकाळी रद्दी होते . त्या वर्तमानपत्राचे मोल अभंग मनाच्या विशेष बालकांना कळले आहे. म्हणूनच आपल्या घरात पडलेली रद्दी जनसेवा समाधान साहित्य पेढीमध्ये जमा करावी,’ असे आवाहन जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी यावेळी केले. यावेळी जनसेवाचे पुष्कर बाबरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज