म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि प्रचारात एकमेकांची लक्तरे काढतात. शिवसेनेवर गुंडगिरीचे आरोप करणारे मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत. गुंडगिरीवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, खुर्चीची चिंता असल्याने तेच या गुंडगिरीला संरक्षण देत आहेत. त्यामुळे शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाही, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोडले.
पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार यांची कळवा आणि वागळे इस्टेट या दोन भागांत रविवारी सभा झाली. त्यात त्यांनी सेना आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर तोंडसुख घेतले. शिवसेना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या सर्व नेत्यांवर आणि त्यांच्या धोरणांवर टीका करत आहे. मात्र, सत्तेची ऊब त्यांना भाजपची साथ सोडू देत नाही. तेवढे धाडस सेनेच्या नेतृत्वाकडे नाही, शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.
आपला मित्रपक्ष काय लायकीचा आहे, हे सांगत त्यांची लक्तरे मुख्यमंत्री प्रभावीपणे जनतेसमोर मांडत आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो, असा टोलाही पवार यांनी लगावला. परंतु, लोकांनी तुम्हाला सत्ता दिली आहे. त्याचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी अखंडपणे करा. सत्ता दिली तर काम करणार आणि नाही दिली तर नाही करणार, या मुख्यमंत्र्यांच्या भाषेतून राज्याच्या हिताची त्यांना किती चिंता आहे, हे ध्वनीत होत असल्याचे पवार यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे देशाचे अपरिमीत नुकसान झाले असल्याचेही पवार यांनी सांगितले. या दोन्ही पक्षांना विकासाप्रती आस्था नाही. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवा आणि राष्ट्रवादीच्या हाती ठाणे शहराची सत्ता द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि प्रचारात एकमेकांची लक्तरे काढतात. शिवसेनेवर गुंडगिरीचे आरोप करणारे मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत. गुंडगिरीवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, खुर्चीची चिंता असल्याने तेच या गुंडगिरीला संरक्षण देत आहेत. त्यामुळे शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाही, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोडले.
पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार यांची कळवा आणि वागळे इस्टेट या दोन भागांत रविवारी सभा झाली. त्यात त्यांनी सेना आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर तोंडसुख घेतले. शिवसेना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या सर्व नेत्यांवर आणि त्यांच्या धोरणांवर टीका करत आहे. मात्र, सत्तेची ऊब त्यांना भाजपची साथ सोडू देत नाही. तेवढे धाडस सेनेच्या नेतृत्वाकडे नाही, शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.
आपला मित्रपक्ष काय लायकीचा आहे, हे सांगत त्यांची लक्तरे मुख्यमंत्री प्रभावीपणे जनतेसमोर मांडत आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो, असा टोलाही पवार यांनी लगावला. परंतु, लोकांनी तुम्हाला सत्ता दिली आहे. त्याचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी अखंडपणे करा. सत्ता दिली तर काम करणार आणि नाही दिली तर नाही करणार, या मुख्यमंत्र्यांच्या भाषेतून राज्याच्या हिताची त्यांना किती चिंता आहे, हे ध्वनीत होत असल्याचे पवार यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे देशाचे अपरिमीत नुकसान झाले असल्याचेही पवार यांनी सांगितले. या दोन्ही पक्षांना विकासाप्रती आस्था नाही. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवा आणि राष्ट्रवादीच्या हाती ठाणे शहराची सत्ता द्या, असे आवाहनही त्यांनी केले.