अ‍ॅपशहर

कॉलेजचे फूड फेस्टिव्हल कॅशलेस

उल्हासनगरातील एस. एस. टी. कॉलेजच्या फूड फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी कॅशलेस विक्री व्यवहार करीत या नव्या अर्थव्यवस्थेचा प्रचार केला. तसेच स्वच्छतेसाठी कचराकुंड्या ठेवत स्वच्छ भारत अभियानातही योगदान दिले.

Maharashtra Times 14 Jan 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम college food festival is cashless
कॉलेजचे फूड फेस्टिव्हल कॅशलेस


उल्हासनगरातील एस. एस. टी. कॉलेजच्या फूड फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी कॅशलेस विक्री व्यवहार करीत या नव्या अर्थव्यवस्थेचा प्रचार केला. तसेच स्वच्छतेसाठी कचराकुंड्या ठेवत स्वच्छ भारत अभियानातही योगदान दिले.

कॅशलेस व्यवहारांसाठी देशभरात सरकारने जोरदार मोहिमा सुरू केल्या आहेत. त्याला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. त्यातच उल्हासनगर कॅम्प ४ येथील एस. एस. टी. कॉलेजने शुक्रवारी आयोजित केलेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्थेचा जोरदार प्रचार केला. या फेस्टिव्हलमध्ये ३६ स्टॉलधारकांपैकी बहुतांश जणांनी पेटीएम आणि भिम अॅपची नोंदणी करीत स्टॉल्स कोड स्कॅन करण्यासाठी ठेवला होता. स्टॉल लावलेल्या विद्यार्थ्यांनी पेटीएम व भिम अॅपचा वापर कसा करावा, याबाबत आम्ही मार्गदर्शन ही केले. याबाबत कॉलेजचे प्राचार्य जे. सी. पुरस्वानी यानी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कॅशलेस अर्थव्यवस्थेचा प्रचार प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे. आमच्या कॉलेजमार्फत देशाच्या विकासासाठी पुरेपुर योगदान दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज