अ‍ॅपशहर

सेवा सुधारा; अन्यथा कारवाई!

एप्रिल महिन्यांत टीएमटीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना सेवा सुधारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र, १०० दिवस लोटल्यानंतरही परिस्थिती सुधारली नसून मंगळवारी पुन्हा महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल टीएमटीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेत टीएमटीची प्रतिमा सुधारा, अन्यथा कठोर कारवाईला तयार रहा, असा अल्टिमेटम दिला आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 4:01 am
टीएमटीला आयुक्तांचा पुन्हा अल्टिमेटम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम commissionor asked to tmt to give efficient service
सेवा सुधारा; अन्यथा कारवाई!


म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

एप्रिल महिन्यांत टीएमटीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना सेवा सुधारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र, १०० दिवस लोटल्यानंतरही परिस्थिती सुधारली नसून मंगळवारी पुन्हा महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल टीएमटीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेत टीएमटीची प्रतिमा सुधारा, अन्यथा कठोर कारवाईला तयार रहा, असा अल्टिमेटम दिला आहे.

टीएमटीचा कारभार सुधारण्यासाठी मंगळवारी सांयकाळी सुमारे अडीच तास पालिका मुख्यालयात बैठक सुरू होती. महापौर, आयुक्तांसह उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांच्यासह पालिकेचे आणि टीएमटीचे अधिकारी आणि समिती सदस्य या बैठकीला हजर होते. टीएमटीच्या सध्या सुरू असलेल्या बेजबाबदार कारभाराचा यावेळी समाचार घेण्यात आला. किरकोळ दुरुस्ती साहित्याअभावी टीएमटीच्या बस डेपोबाहेर पडत नाही. त्याची कारणे विचारत या बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेली मदतीचा प्रस्ताव तयार करून त्याला तातडीने मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन यावेळी महापौरांनी दिले. वागळे आणि कळवा डेपोतील समस्या मार्गी लावण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. आपापसातील हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवत टीएमटी रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करा. असा सल्ला यावेळी देण्यात आला.

पूर्ण क्षमतेने काम करा

परिवहन सेवा सुधारण्यासाठी जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर धावायला हव्यात जेणेकरून नागरिकांमध्ये परिवहन सेवेविषयी जी नकारात्मक भूमिका आहे ती कमी होईल. त्यासाठी परिवहन सदस्यांपासून ते परिवहन व्यवस्थापक आणि कार्यशाळेतील प्रत्येक कर्मचारी यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. परिवहन सेवा सुधारताना नागरिकांच्या सूचनांचा विचार करण्याचे निर्देशही देण्यात आले. येत्या काही दिवसात परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होणार असल्याने परिवहन सेवा काही प्रमाणात सुरळीत होईल. पण जुन्या बंद पडलेल्या बसेसही दुरुस्त करून रस्त्यावर आणा, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज