राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मदतनिधी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
राज्यसेवा आणि प्रशासन आदी क्षेत्रांमध्ये भरारी घेण्याचे स्वप्न असून केवळ आर्थिक कारणांमुळे या स्वप्नांना बांध घालणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा आधार मिळणार आहे. मुरबाड, भिवंडी, शहापूर आदी ठिकाणच्या आदिवासी, गरजू विद्यार्थ्यांना राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी विविध शिक्षण संस्थांची मदत घेत त्यांच्या प्रशिक्षणासह परीक्षांसाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने त्यांना आर्थिक मदतनिधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
इंजिनिअरिंग, मेडिकल अशा पठडीतील क्षेत्रांपेक्षा करिअरच्या वेगळ्या वाटा निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. यामध्येही यूपीएससी, एमपीएससी अशा सेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण करत राज्यव्यवस्थापन क्षेत्र हा अनेकांचा ध्यास असतो. शहरी विद्यार्थ्यांना पालकांच्या पाठिंब्यासह दर्जेदार शिक्षण संस्थांकडून प्रशिक्षण मिळते. मात्र बारावीपासून सुरू होणारे हे प्रशिक्षण, सराव परीक्षा यांचा खर्चही अधिक असतो. शहरी विद्यार्थ्यांना हे सर्व सहज शक्य असले तरी जिल्ह्यातील खेडी, पाडे येथे मात्र परीक्षा सराव अद्याप पोहचलेला नाही. येथील विद्यार्थ्यांना राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांत सहभागी होण्याची जिद्द असली तरी पुरेशा मार्गदर्शनाअभावी त्यांना पात्र होता येत नसल्याचे आढळते. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी या विद्यार्थ्यांसाठी नवी योजना अंमलात आणली आहे.
भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी ठिकाणांमधील गरजू तसेच आदिवासी, अनुसुचित जाती जमातातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक पात्रता आणि स्पर्धा सेवा परीक्षेसाठी बसण्याची त्याची इच्छा यांच्या आधारे इच्छुक मुलांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसीलदारांचीही मदत घेतली आहे. आपापल्या भागातील गरजू आणि इच्छुक विद्यार्थ्यांची माहिती या तहसीलदारांकडून मागविण्यात आली आहे. आलेले अर्ज तसेच माहितीची छाननी करून त्यातून निवड केली जाणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा सर्व खर्च जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला जाणार आहे.
नामांकित संस्थांकडून मार्गदर्शन
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ठाणे, मुंबई, पुणे आदी शहरातील स्पर्धा परीक्षांचे केंद्र तसेच मार्गदर्शन करणाऱ्या नामांकित संस्थांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यांच्याशीही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे संवाद साधण्यात येत असून या संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, तसेच सराव परीक्षेसह प्रत्यक्ष परीक्षांसाठी सज्ज करणार असल्याची माहिती कल्याणकर यांनी दिली.
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
राज्यसेवा आणि प्रशासन आदी क्षेत्रांमध्ये भरारी घेण्याचे स्वप्न असून केवळ आर्थिक कारणांमुळे या स्वप्नांना बांध घालणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा आधार मिळणार आहे. मुरबाड, भिवंडी, शहापूर आदी ठिकाणच्या आदिवासी, गरजू विद्यार्थ्यांना राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी विविध शिक्षण संस्थांची मदत घेत त्यांच्या प्रशिक्षणासह परीक्षांसाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने त्यांना आर्थिक मदतनिधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
इंजिनिअरिंग, मेडिकल अशा पठडीतील क्षेत्रांपेक्षा करिअरच्या वेगळ्या वाटा निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. यामध्येही यूपीएससी, एमपीएससी अशा सेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण करत राज्यव्यवस्थापन क्षेत्र हा अनेकांचा ध्यास असतो. शहरी विद्यार्थ्यांना पालकांच्या पाठिंब्यासह दर्जेदार शिक्षण संस्थांकडून प्रशिक्षण मिळते. मात्र बारावीपासून सुरू होणारे हे प्रशिक्षण, सराव परीक्षा यांचा खर्चही अधिक असतो. शहरी विद्यार्थ्यांना हे सर्व सहज शक्य असले तरी जिल्ह्यातील खेडी, पाडे येथे मात्र परीक्षा सराव अद्याप पोहचलेला नाही. येथील विद्यार्थ्यांना राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांत सहभागी होण्याची जिद्द असली तरी पुरेशा मार्गदर्शनाअभावी त्यांना पात्र होता येत नसल्याचे आढळते. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी या विद्यार्थ्यांसाठी नवी योजना अंमलात आणली आहे.
भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी ठिकाणांमधील गरजू तसेच आदिवासी, अनुसुचित जाती जमातातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक पात्रता आणि स्पर्धा सेवा परीक्षेसाठी बसण्याची त्याची इच्छा यांच्या आधारे इच्छुक मुलांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसीलदारांचीही मदत घेतली आहे. आपापल्या भागातील गरजू आणि इच्छुक विद्यार्थ्यांची माहिती या तहसीलदारांकडून मागविण्यात आली आहे. आलेले अर्ज तसेच माहितीची छाननी करून त्यातून निवड केली जाणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा सर्व खर्च जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला जाणार आहे.
नामांकित संस्थांकडून मार्गदर्शन
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ठाणे, मुंबई, पुणे आदी शहरातील स्पर्धा परीक्षांचे केंद्र तसेच मार्गदर्शन करणाऱ्या नामांकित संस्थांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यांच्याशीही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे संवाद साधण्यात येत असून या संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, तसेच सराव परीक्षेसह प्रत्यक्ष परीक्षांसाठी सज्ज करणार असल्याची माहिती कल्याणकर यांनी दिली.