अ‍ॅपशहर

तक्रार निवारणाचा मार्ग सोपा

समस्यांच्या निवारणासाठी मंगळवारी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या दालनासमोर होणारी गर्दी आता दिसणार नाही. नागरिकांच्या समस्या किंबहुना तक्रारी निवारणासाठी प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी विशेष अधिकार दिल्यामुळे यापुढे नागरिकांच्या तक्रार निवारणाचा मार्ग सोपा होणार आहे.

Maharashtra Times 9 Jan 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम complaint greivences now easy
तक्रार निवारणाचा मार्ग सोपा


समस्यांच्या निवारणासाठी मंगळवारी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या दालनासमोर होणारी गर्दी आता दिसणार नाही. नागरिकांच्या समस्या किंबहुना तक्रारी निवारणासाठी प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी विशेष अधिकार दिल्यामुळे यापुढे नागरिकांच्या तक्रार निवारणाचा मार्ग सोपा होणार आहे.

आठवड्याच्या दर मंगळवारी आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. यामध्ये अनेक समस्या मांडल्या जातात. त्यात नाले, गटारे, पाणीटंचाई आदी समस्यांचाही समावेश असतो. या समस्या त्या हद्दीत असलेल्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत सोडवता येऊ शकतात. मात्र याविषयी नागरिक अनभिज्ञ असल्याने ते पालिकेकडे धाव घेतात. उल्हासनगरात प्रभागनिहाय चार प्रभाग समिती कार्यालये आहेत. त्यात गणेश शिंपी, अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत हे सहाय्यक आयुक्त आहेत. यापुढे आठवड्याच्या दर सोमवारी सहाय्यक आयुक्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत. यासाठी नागरिकांना प्रभाग समितीत अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समस्येचे निवारण १५ दिवसांत करून त्याचे लेखी उत्तर सहाय्यक आयुक्तांनी तक्रारदाराला द्यायचे आहे. त्यानंतरही तक्रारदाराची समस्या न सुटल्यास मंगळवारी आयुक्तांना भेटण्याच्या वेळेत उत्तराची प्रत घेऊन यावे, असे पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज