म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
पावसाळ्याच्या दृष्टीने सुरू असलेली कामे आणि उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर वाढल्याने सुरू असलेले लोडशेडिंग यामुळे सामान्य नागरिक कंटाळलेले असताना महावितरणकडून तक्रार सोडवण्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तक्रार निवारणासाठी असलेल्या किचकट प्रक्रियेमुळे तक्रार नोंदवताना वेळ तर लागतोच, शिवाय महावितरणकडून या तक्रारींचा आढावा घेऊन त्या सोडवण्यातसुद्धा बराच कालावधी वाया जात आहे. यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.
वीजपुरवठा खंडित झाल्यावर तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ कार्यवाही व्हावी अशी सामान्यांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र काही तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तक्रारींबद्दल विचारणा करण्यासाठी महावितरणद्वारे संपर्क केला जात असल्याचा अनुभव काही ग्राहकांना येत आहे. एकीकडे २४ बाय ७ असलेली हेल्पलाइन, इंटरनेट यांच्या माध्यमातून तक्रार नोंदवण्यास महावितरणकडून सांगितले जात असले, तरीही त्याची कार्यवाही करण्यास मात्र उशीर होत आहे. यामुळे तक्रार करावी कशासाठी, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे सातत्याने कल्याण, डोंबिवलीमध्ये रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबद्दल तक्रार करून समस्या सोडवण्यासाठी ग्राहक हेल्पलाइनला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते हेल्पलाइनपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी उशिराने तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केल्यास ग्राहकांना हा अनुभव मोठ्या प्रमाणावर येत आहे. रात्री तक्रार केल्यानंतरसुद्धा बऱ्याचवेळा सकाळी दुरुस्तीसाठी अधिकारी येतात. त्याचबरोबर या तक्रारीची सद्यस्थिती आणि इतर माहिती, बिघाडाचे कारण ग्राहकांना समजत नाही. त्यामुळे ग्राहकांना तक्रार निवारण प्रक्रियेबद्दल साशंकता आहे. रात्रीच्या वेळी स्थानिक कार्यालयांच्या क्रमांकावर संपर्क होत नाही. त्यामुळे मध्यवर्ती यंत्रणेकडे तक्रार दाखल करावी लागते आणि ती तक्रार संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. त्यामुळे ग्राहकांना सध्या प्रतीक्षा करावी लागत आहे. याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तक्रार निवारणासाठी मोबाइल अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे ग्राहकांना तक्रारीची सद्यस्थिती आणि इतर माहितीसुद्धा मिळू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या दृष्टीने सुरू असलेली कामे आणि उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर वाढल्याने सुरू असलेले लोडशेडिंग यामुळे सामान्य नागरिक कंटाळलेले असताना महावितरणकडून तक्रार सोडवण्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तक्रार निवारणासाठी असलेल्या किचकट प्रक्रियेमुळे तक्रार नोंदवताना वेळ तर लागतोच, शिवाय महावितरणकडून या तक्रारींचा आढावा घेऊन त्या सोडवण्यातसुद्धा बराच कालावधी वाया जात आहे. यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.
वीजपुरवठा खंडित झाल्यावर तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ कार्यवाही व्हावी अशी सामान्यांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र काही तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तक्रारींबद्दल विचारणा करण्यासाठी महावितरणद्वारे संपर्क केला जात असल्याचा अनुभव काही ग्राहकांना येत आहे. एकीकडे २४ बाय ७ असलेली हेल्पलाइन, इंटरनेट यांच्या माध्यमातून तक्रार नोंदवण्यास महावितरणकडून सांगितले जात असले, तरीही त्याची कार्यवाही करण्यास मात्र उशीर होत आहे. यामुळे तक्रार करावी कशासाठी, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे सातत्याने कल्याण, डोंबिवलीमध्ये रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबद्दल तक्रार करून समस्या सोडवण्यासाठी ग्राहक हेल्पलाइनला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते हेल्पलाइनपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी उशिराने तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केल्यास ग्राहकांना हा अनुभव मोठ्या प्रमाणावर येत आहे. रात्री तक्रार केल्यानंतरसुद्धा बऱ्याचवेळा सकाळी दुरुस्तीसाठी अधिकारी येतात. त्याचबरोबर या तक्रारीची सद्यस्थिती आणि इतर माहिती, बिघाडाचे कारण ग्राहकांना समजत नाही. त्यामुळे ग्राहकांना तक्रार निवारण प्रक्रियेबद्दल साशंकता आहे. रात्रीच्या वेळी स्थानिक कार्यालयांच्या क्रमांकावर संपर्क होत नाही. त्यामुळे मध्यवर्ती यंत्रणेकडे तक्रार दाखल करावी लागते आणि ती तक्रार संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. त्यामुळे ग्राहकांना सध्या प्रतीक्षा करावी लागत आहे. याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तक्रार निवारणासाठी मोबाइल अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे ग्राहकांना तक्रारीची सद्यस्थिती आणि इतर माहितीसुद्धा मिळू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.