म. टा. वृत्तसेवा, ठाणे
राज्य परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटीच्या ठाणे रेल्वे स्थानकात डेपो क्रमांक दोनच्या आख्यारित असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच चौकशी केंद्र, वाहतूक नियंत्रण, बसगाड्यांच्या नोंदी यासाठी एकाच कर्मचाऱ्याची नेमणूक झाल्याने कर्मचाऱ्यांना रोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
एसटीच्या डेपो क्रमांक दोनच्या आख्यारितील वाहतूक नियंत्रण कक्ष ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका अडगळीच्या जागेत आहे. येथील वाहतूक नियंत्रकांना भिवंडी, वाडा, पालघर, डहाणू इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या बसगाड्यांचे नियंत्रण करावे लागते. तसेच या बसगाड्यांच्या नोंदी आणि प्रवाशांकडून होणारी चौकशीही याच कक्षातून होत असते. मात्र, काही दिवसांपासून येथील तीन कर्मचाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण ताण एकाच कर्मचाऱ्याला सहन करावा लागत असल्याचा आरोप एसटीचे निवृत्त विभाग नियंत्रक अधिकारी विजय साटम यांनी केला. त्यामुळे एसटी गाड्यांच्या नोंदी, प्रवाशांकडून केल्या जात असलेल्या चौकशा आणि वाहतुकीचे नियंत्रण या तिन्ही गोष्टी एकाच कर्मचाऱ्याला कराव्या लागत आहेत. एसटीमध्ये सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन शिफ्टमध्ये वाहतूक नियंत्रकाला काम करावे लागते. मात्र, येथे चुकीच्या पद्धतीने शिफ्ट लावल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वाहतूक नियंत्रण कक्ष अगदी गलिच्छ जागेत उभारण्यात आले आहे. या कक्षाच्या मागच्या बाजूला घाण साठलेली असते. त्यामुळे डास आणि कचऱ्यामुळे कामगारांना काम करणे कठीण जात आहे. एसटीमध्ये कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे यासंबंधीचे पत्र मी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना दिले आहे. याची दखल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल, अशी आशा करत असल्याचे विजय साटम यांनी सांगितले.
राज्य परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटीच्या ठाणे रेल्वे स्थानकात डेपो क्रमांक दोनच्या आख्यारित असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच चौकशी केंद्र, वाहतूक नियंत्रण, बसगाड्यांच्या नोंदी यासाठी एकाच कर्मचाऱ्याची नेमणूक झाल्याने कर्मचाऱ्यांना रोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
एसटीच्या डेपो क्रमांक दोनच्या आख्यारितील वाहतूक नियंत्रण कक्ष ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका अडगळीच्या जागेत आहे. येथील वाहतूक नियंत्रकांना भिवंडी, वाडा, पालघर, डहाणू इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या बसगाड्यांचे नियंत्रण करावे लागते. तसेच या बसगाड्यांच्या नोंदी आणि प्रवाशांकडून होणारी चौकशीही याच कक्षातून होत असते. मात्र, काही दिवसांपासून येथील तीन कर्मचाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण ताण एकाच कर्मचाऱ्याला सहन करावा लागत असल्याचा आरोप एसटीचे निवृत्त विभाग नियंत्रक अधिकारी विजय साटम यांनी केला. त्यामुळे एसटी गाड्यांच्या नोंदी, प्रवाशांकडून केल्या जात असलेल्या चौकशा आणि वाहतुकीचे नियंत्रण या तिन्ही गोष्टी एकाच कर्मचाऱ्याला कराव्या लागत आहेत. एसटीमध्ये सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन शिफ्टमध्ये वाहतूक नियंत्रकाला काम करावे लागते. मात्र, येथे चुकीच्या पद्धतीने शिफ्ट लावल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वाहतूक नियंत्रण कक्ष अगदी गलिच्छ जागेत उभारण्यात आले आहे. या कक्षाच्या मागच्या बाजूला घाण साठलेली असते. त्यामुळे डास आणि कचऱ्यामुळे कामगारांना काम करणे कठीण जात आहे. एसटीमध्ये कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे यासंबंधीचे पत्र मी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना दिले आहे. याची दखल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल, अशी आशा करत असल्याचे विजय साटम यांनी सांगितले.