म. टा. वृत्तसेवा, शहापूर नाशिक-मुंबई रेल्वे मार्गांवर शुक्रवारी दुपारी अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मुंबईच्या दिशेकडील वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती. परिणामी मुबंईच्या दिशेने येणाऱ्या कामायनी एक्स्प्रेससह अन्य गाड्या इगतपुरी स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. दरडी कोसळल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दरडी हटवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. आंदोलनाचा इशारा यावर्षी कसारा रेल्वे घाटात सतत दरडी कोसळत असून त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याने रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनेचे राजेश घनगाव यांनी दिला आहे.
कसारा घाटात कोसळली दरड
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2019, 4:00 am