म. टा. वृत्तसेवा, ठाणे
दहीहंडी उत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना या उत्सवाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरात अक्षरशः शुकशुकाट आहे. मातोश्रीच्या आदेशामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी उत्सवाची तयारी सुरू ठेवली असून त्यात दरवर्षीचा उत्साह मुळीच दिसत नाही. उंचच उंच थरांचा ‘थरथराट’... लाखोंच्या रकमांचा बक्षीसरूपी पाऊस, सोन्याच्या नाण्यांपासून चांदीच्या गदेपर्यंतची विशेष बक्षीसे असणाऱ्या ठाण्यातील दहीहंड्यांचे थर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने डगमगले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येईल, असा सूर सर्वच प्रमुख आयोजकांनी आळवला आहे.
उत्सवाची परंपरा जपत दहीहंडी साजरी करण्यावर शिवसेना पुरस्कृत सर्वच आयोजक ठाम आहेत. अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या टेंभी नाका उत्सवात रितीरिवाजाप्रमाणे संस्कृती जपत उत्सव साजरा करण्यावर भर असणार आहे. टेंभीनाक्यावर याआधीही थरांची स्पर्धा नव्हती, तीच प्रथा यंदा कायम राहील, असे सांगितले जात आहे. तर, वर्तकनगर येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने थरांच्या स्पर्धा न करता सहभागी प्रत्येक गोविंदास मानधन, मानपत्र तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त साहित्य देण्यात येईल, असे सांगण्यात आले. रघुनाथ नगर येथील संकल्पचा उत्सव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन न करता साजरा केला जाईल, असे सांगण्यात आले. जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवात सर्वांना आकर्षित करण्यासाठी व करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला, नृत्ये, मराठी व हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवात मनोरंजनासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई, ठाणे येथील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी एक लाखाचे पारितोषिक असणारी दहीहंडी आणि महिला गोविंदा पथकांना २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह या ठिकाणी देण्यात येणार आहे.
दहीहंडी उत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना या उत्सवाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरात अक्षरशः शुकशुकाट आहे. मातोश्रीच्या आदेशामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी उत्सवाची तयारी सुरू ठेवली असून त्यात दरवर्षीचा उत्साह मुळीच दिसत नाही. उंचच उंच थरांचा ‘थरथराट’... लाखोंच्या रकमांचा बक्षीसरूपी पाऊस, सोन्याच्या नाण्यांपासून चांदीच्या गदेपर्यंतची विशेष बक्षीसे असणाऱ्या ठाण्यातील दहीहंड्यांचे थर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने डगमगले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येईल, असा सूर सर्वच प्रमुख आयोजकांनी आळवला आहे.
उत्सवाची परंपरा जपत दहीहंडी साजरी करण्यावर शिवसेना पुरस्कृत सर्वच आयोजक ठाम आहेत. अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या टेंभी नाका उत्सवात रितीरिवाजाप्रमाणे संस्कृती जपत उत्सव साजरा करण्यावर भर असणार आहे. टेंभीनाक्यावर याआधीही थरांची स्पर्धा नव्हती, तीच प्रथा यंदा कायम राहील, असे सांगितले जात आहे. तर, वर्तकनगर येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने थरांच्या स्पर्धा न करता सहभागी प्रत्येक गोविंदास मानधन, मानपत्र तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त साहित्य देण्यात येईल, असे सांगण्यात आले. रघुनाथ नगर येथील संकल्पचा उत्सव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन न करता साजरा केला जाईल, असे सांगण्यात आले. जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवात सर्वांना आकर्षित करण्यासाठी व करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला, नृत्ये, मराठी व हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवात मनोरंजनासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई, ठाणे येथील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी एक लाखाचे पारितोषिक असणारी दहीहंडी आणि महिला गोविंदा पथकांना २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह या ठिकाणी देण्यात येणार आहे.