म. टा. वृत्तसेवा, पालघर
बेजबाबदार पर्यटकांमुळे डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यांलगतच्या सुरूच्या बागेला व जैवविविधतेला मोठी हानी पोहचत आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून, डहाणू उपवनसंरक्षकांनी याप्रकरणी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
तालुक्यातील किनारपट्टीवरील जमिनीची धूप रोखण्यासाठी सुरू बागांची लागवड करण्यात आली असून घोलवड, चिखले, नरपड, आणि बोर्डी येथे गर्द झाडी आहे. तर जमिनीवर हिरव्या गवताची चादर वर्षभर असते. त्यापैकी चिखले खाडीपाडा येथील सर्वे कक्ष क्रमांक ११६६ मध्ये अच्युतराव पटवर्धन उपवनाची निर्मिती २००१ साली करून २५ एकर क्षेत्रात ११ हजार ११० सुरूची झाडे लावण्यात अली आहेत.
तालुक्यात २००५ मध्ये सेवामयी आचार्य भिसे उपवनात पावणेपाच एकर क्षेत्रावर २११० झाडे लावण्यात आली आहेत. वडकती येथे २०१२ साली मत्स्य उपवनात २५ एकर क्षेत्रावर ११ हजार ११० झाडांची लागवड करण्यात आली आहे. निधीचा योग्य वापर करून तारेचे कुंपण, पाण्याची सुविधा उपलब्ध केली होती. शिवाय तत्कालीन वन कर्मचाऱ्यांनी संरक्षण व संवर्धन केल्याने दाट झाडी निर्माण झाली होती.
मात्र, अलीकडच्या काळात या विभागाचा कल पर्यावरण संरक्षणापेक्षा पर्यटन विकासाकडे अधिक असल्याचे दिसून येते. रिठी भागातील चिखले पोलिस चौकीसमोर २०१५-१६मध्ये स्थानिक नागरिकांनी सुमारे चार ते पाच हजार ताडबियांची लागवड केली. मात्र, पर्यटनाला चालना देण्यासाठी ही रोपे पायदळी तुडवून बोर्डी वन परिक्षेत्राकडून खेळण्याचे साहित्य आणि बाके बसविण्यात आली आहेत. तर पेव्हरब्लॉक बसविण्याला स्थानिक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविल्याने काम थांबविण्यात आले.
लाखो रुपये खर्चून खाडीपाडा ते चिखले नवेखाडी दरम्यान २०१६ मध्ये नव्याने तारेचे कुंपण केले. परंतु, चित्रपट व मालिकांच्या शूटिंगसाठी परवानगी दिली जात असल्याने वाहनांमुळे धूप होत आहे. याशिवाय रेतीचोरांची तसेच अविवेकी पर्यटकांची वाहने बागेत पार्क केली जातात. वनभोजनाच्या नावाखाली चूल पेटविणे, मोठ मोठ्याने म्युझिक सिस्टिम लाऊन धिंगाणा घातला जातो, तर प्रेमीयुगलांचे खुलेआम अश्लील चाळे चालतात.
वर्षभरात स्थानिक नागरिक व शाळांचे विद्यार्थी येथे स्वच्छता मोहीम राबवत असले, तरी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा फेकला जात असल्याने जैवविविधतेला हानी पोहचत आहे. ही बाब नियुक्त केलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यावर बेजबाबदार, उर्मट उत्तरे दिली जातात. याची गभीर दखल उपवन संरक्षकांनी घेऊन तत्काळ ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी केली जात आहे.
फोटो: चिखले खाडीपाडा सुरू बागेची बेजबाबदार पर्यकांमुळे दुर्दशा झाली असून, वनविभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
- उषा पाटील
बेजबाबदार पर्यटकांमुळे डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यांलगतच्या सुरूच्या बागेला व जैवविविधतेला मोठी हानी पोहचत आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून, डहाणू उपवनसंरक्षकांनी याप्रकरणी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
तालुक्यातील किनारपट्टीवरील जमिनीची धूप रोखण्यासाठी सुरू बागांची लागवड करण्यात आली असून घोलवड, चिखले, नरपड, आणि बोर्डी येथे गर्द झाडी आहे. तर जमिनीवर हिरव्या गवताची चादर वर्षभर असते. त्यापैकी चिखले खाडीपाडा येथील सर्वे कक्ष क्रमांक ११६६ मध्ये अच्युतराव पटवर्धन उपवनाची निर्मिती २००१ साली करून २५ एकर क्षेत्रात ११ हजार ११० सुरूची झाडे लावण्यात अली आहेत.
तालुक्यात २००५ मध्ये सेवामयी आचार्य भिसे उपवनात पावणेपाच एकर क्षेत्रावर २११० झाडे लावण्यात आली आहेत. वडकती येथे २०१२ साली मत्स्य उपवनात २५ एकर क्षेत्रावर ११ हजार ११० झाडांची लागवड करण्यात आली आहे. निधीचा योग्य वापर करून तारेचे कुंपण, पाण्याची सुविधा उपलब्ध केली होती. शिवाय तत्कालीन वन कर्मचाऱ्यांनी संरक्षण व संवर्धन केल्याने दाट झाडी निर्माण झाली होती.
मात्र, अलीकडच्या काळात या विभागाचा कल पर्यावरण संरक्षणापेक्षा पर्यटन विकासाकडे अधिक असल्याचे दिसून येते. रिठी भागातील चिखले पोलिस चौकीसमोर २०१५-१६मध्ये स्थानिक नागरिकांनी सुमारे चार ते पाच हजार ताडबियांची लागवड केली. मात्र, पर्यटनाला चालना देण्यासाठी ही रोपे पायदळी तुडवून बोर्डी वन परिक्षेत्राकडून खेळण्याचे साहित्य आणि बाके बसविण्यात आली आहेत. तर पेव्हरब्लॉक बसविण्याला स्थानिक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविल्याने काम थांबविण्यात आले.
लाखो रुपये खर्चून खाडीपाडा ते चिखले नवेखाडी दरम्यान २०१६ मध्ये नव्याने तारेचे कुंपण केले. परंतु, चित्रपट व मालिकांच्या शूटिंगसाठी परवानगी दिली जात असल्याने वाहनांमुळे धूप होत आहे. याशिवाय रेतीचोरांची तसेच अविवेकी पर्यटकांची वाहने बागेत पार्क केली जातात. वनभोजनाच्या नावाखाली चूल पेटविणे, मोठ मोठ्याने म्युझिक सिस्टिम लाऊन धिंगाणा घातला जातो, तर प्रेमीयुगलांचे खुलेआम अश्लील चाळे चालतात.
वर्षभरात स्थानिक नागरिक व शाळांचे विद्यार्थी येथे स्वच्छता मोहीम राबवत असले, तरी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा फेकला जात असल्याने जैवविविधतेला हानी पोहचत आहे. ही बाब नियुक्त केलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यावर बेजबाबदार, उर्मट उत्तरे दिली जातात. याची गभीर दखल उपवन संरक्षकांनी घेऊन तत्काळ ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी केली जात आहे.
फोटो: चिखले खाडीपाडा सुरू बागेची बेजबाबदार पर्यकांमुळे दुर्दशा झाली असून, वनविभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
- उषा पाटील