म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
महावितरणच्या वाढीव वीजबिलाबद्दल भाजपद्वारे आंदोलन करण्यात आल्यानंतर ग्राहकांना वीजबिलाच्या रकमेत सवलत देऊन मूळ बिले पाठवण्यात आली आहेत. मात्र यामुळे वीजबिलामधील गोंधळ समोर आला आहे. वीजबिलाच्या रीडिंगमध्येच गोंधळ असल्याने जास्त दराची वीजबिले ग्राहकांना येत आहेत. त्यामुळे याकडे महावितरणद्वारे लक्ष दिले जावे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.
मोबाइलच्या माध्यमातून रीडिंग घेताना काही वेळा चुकीचे रीडिंग घेतले जात असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, रीडिंग घेतल्यानंतर ते योग्य आहे की नाही, याची चाचपणी प्रत्येकवेळी केली जात नाही. त्यातच बिलावर छापून येणारे फोटोसुद्धा काही वेळा अस्पष्ट असतात. त्यामुळे दाद मागतानासुद्धा ग्राहकांना अडचणी येत आहेत. मीटर रीडिंगसाठी येणाऱ्या एजन्सीद्वारे रीडिंग योग्य प्रकारे घेतले जात नसल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. मोबाइलद्वारे रीडिंग नोंदवताना चुकीच्या प्रकारे रीडिंग घेतले जाते, त्यातच काहीवेळा घाईघाईने रीडिंग घेतले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम वीजबिलावर होताना दिसत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
चुकीच्या वीजबिलाबद्दल ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांना योग्य तपासणी करून दिलासा मिळू शकतो, असा महावितरणचा दावा आहे. मात्र कारवाईची किचकट प्रक्रिया आणि लागणारा वेळ यामुळे सामान्य याकडे वळत नसल्याचे दिसून येत आहे. एजन्सीद्वारे चुका झाल्यास त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येते, असा प्रश्न सामान्य उपस्थित करत आहेत.
सुधारणा हवीच
अलीकडे मोठ्या प्रमाणावर येणारी वाढीव वीजबिले कमी व्हावीत, त्याचबरोबर मीटर रीडिंग योग्य प्रकारे घेतले जावे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. महावितरणद्वारे सध्या येणाऱ्या बिलाच्या रकमेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन योग्य बिले ग्राहकांकडे गेली पाहिजेत, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. आजही बऱ्याच ग्राहकांना जादा वीजबिलाची रक्कम भरावी लागते. याबद्दल तक्रार करायची झाली, तर महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री कार्यालयात जाऊन मोठी प्रक्रिया पार पडावी लागते. त्यामुळे यावर तोडगा शोधण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे.
महावितरणच्या वाढीव वीजबिलाबद्दल भाजपद्वारे आंदोलन करण्यात आल्यानंतर ग्राहकांना वीजबिलाच्या रकमेत सवलत देऊन मूळ बिले पाठवण्यात आली आहेत. मात्र यामुळे वीजबिलामधील गोंधळ समोर आला आहे. वीजबिलाच्या रीडिंगमध्येच गोंधळ असल्याने जास्त दराची वीजबिले ग्राहकांना येत आहेत. त्यामुळे याकडे महावितरणद्वारे लक्ष दिले जावे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.
मोबाइलच्या माध्यमातून रीडिंग घेताना काही वेळा चुकीचे रीडिंग घेतले जात असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, रीडिंग घेतल्यानंतर ते योग्य आहे की नाही, याची चाचपणी प्रत्येकवेळी केली जात नाही. त्यातच बिलावर छापून येणारे फोटोसुद्धा काही वेळा अस्पष्ट असतात. त्यामुळे दाद मागतानासुद्धा ग्राहकांना अडचणी येत आहेत. मीटर रीडिंगसाठी येणाऱ्या एजन्सीद्वारे रीडिंग योग्य प्रकारे घेतले जात नसल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. मोबाइलद्वारे रीडिंग नोंदवताना चुकीच्या प्रकारे रीडिंग घेतले जाते, त्यातच काहीवेळा घाईघाईने रीडिंग घेतले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम वीजबिलावर होताना दिसत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
चुकीच्या वीजबिलाबद्दल ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांना योग्य तपासणी करून दिलासा मिळू शकतो, असा महावितरणचा दावा आहे. मात्र कारवाईची किचकट प्रक्रिया आणि लागणारा वेळ यामुळे सामान्य याकडे वळत नसल्याचे दिसून येत आहे. एजन्सीद्वारे चुका झाल्यास त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येते, असा प्रश्न सामान्य उपस्थित करत आहेत.
सुधारणा हवीच
अलीकडे मोठ्या प्रमाणावर येणारी वाढीव वीजबिले कमी व्हावीत, त्याचबरोबर मीटर रीडिंग योग्य प्रकारे घेतले जावे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. महावितरणद्वारे सध्या येणाऱ्या बिलाच्या रकमेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन योग्य बिले ग्राहकांकडे गेली पाहिजेत, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. आजही बऱ्याच ग्राहकांना जादा वीजबिलाची रक्कम भरावी लागते. याबद्दल तक्रार करायची झाली, तर महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री कार्यालयात जाऊन मोठी प्रक्रिया पार पडावी लागते. त्यामुळे यावर तोडगा शोधण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे.