म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
डोंबिवली एमआयडीसीत नुकताच झालेला बॉयलर स्फोट आणि त्यानंतर ऐरणीवर आलेला प्रदूषणाचा मुद्दा, यामुळे निवासी विभागात राहणाऱ्या सामान्यांच्या समस्या प्रामुख्याने समोर आल्या होत्या. त्यानंतर आता प्रदूषण महामंडळाचे कार्यालय कल्याणऐवजी डोंबिवलीत स्थलांतरित करा, मंडळाच्या अधिकाऱ्यांना येथील समस्यांची जाणीव होऊ द्या, अशी मागणी येथील संतप्त रहिवाशांनी केली आहे.
एमआयडीसीत नेहमी वायुगळती होते. रसायनांच्या वासामुळे उलट्या, वारंवार सर्दी खोकला होणे, हातापायातील शक्ती जाणे, अंग थरथरणे, आदी त्रास येथील रहिवाशांना होतो. लहान मुलांना कायमचे अपंगत्व येण्याचा धोकाही आहे. वायुगळती अथवा कोणतीही तक्रार केल्याशिवाय प्रदूषण मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याची तीव्रता जाणवत नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
तसेच त्यांना कल्याणहून घटनास्थळी येण्यास विलंब होतो. त्यामुळे प्रदूषण मंडळाचे कार्यालय डोंबिवली एमआयडीसी परिसरात स्थलांतरित करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्फोटानंतर पालिकेने डोंबिवलीतील रसायनिक कंपन्या शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कायदेशीर बाबींमुळे त्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे काही उपाय तातडीने करणे अत्यंत गरजेचे आहे. डोंबिवली निवासी विभागात प्रदूषणाची पातळी दर्शवणारा फलक लावावा, सर्व कंपन्यांनी फॅक्टरी ऑडिट, प्रदूषण मंडळांच्या नियमांनुसार उपाययोजना केल्या आहेत का, त्याचा अहवाल बनवावा, प्रत्येक रासायनिक कंपन्यांच्या दर्शनी भागावर प्रदूषणाची पातळी दर्शविणारा फलक लावावा, प्रदूषणाची पातळी वाढल्यास धोक्याची घंटा तेथे वाजवणे गरजेचे आहे, त्याचे नियंत्रण प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात असावे, प्रदूषण मंडळ आणि पोलिसांनी दररोज रात्री गस्त घालावी, एखादा अपघात झाल्यास परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगळी आपत्कालीन सेवा उभारावी, यांसारख्या मागण्या रहिवासी करत आहेत.
डोंबिवली एमआयडीसीत नुकताच झालेला बॉयलर स्फोट आणि त्यानंतर ऐरणीवर आलेला प्रदूषणाचा मुद्दा, यामुळे निवासी विभागात राहणाऱ्या सामान्यांच्या समस्या प्रामुख्याने समोर आल्या होत्या. त्यानंतर आता प्रदूषण महामंडळाचे कार्यालय कल्याणऐवजी डोंबिवलीत स्थलांतरित करा, मंडळाच्या अधिकाऱ्यांना येथील समस्यांची जाणीव होऊ द्या, अशी मागणी येथील संतप्त रहिवाशांनी केली आहे.
एमआयडीसीत नेहमी वायुगळती होते. रसायनांच्या वासामुळे उलट्या, वारंवार सर्दी खोकला होणे, हातापायातील शक्ती जाणे, अंग थरथरणे, आदी त्रास येथील रहिवाशांना होतो. लहान मुलांना कायमचे अपंगत्व येण्याचा धोकाही आहे. वायुगळती अथवा कोणतीही तक्रार केल्याशिवाय प्रदूषण मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याची तीव्रता जाणवत नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
तसेच त्यांना कल्याणहून घटनास्थळी येण्यास विलंब होतो. त्यामुळे प्रदूषण मंडळाचे कार्यालय डोंबिवली एमआयडीसी परिसरात स्थलांतरित करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्फोटानंतर पालिकेने डोंबिवलीतील रसायनिक कंपन्या शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कायदेशीर बाबींमुळे त्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे काही उपाय तातडीने करणे अत्यंत गरजेचे आहे. डोंबिवली निवासी विभागात प्रदूषणाची पातळी दर्शवणारा फलक लावावा, सर्व कंपन्यांनी फॅक्टरी ऑडिट, प्रदूषण मंडळांच्या नियमांनुसार उपाययोजना केल्या आहेत का, त्याचा अहवाल बनवावा, प्रत्येक रासायनिक कंपन्यांच्या दर्शनी भागावर प्रदूषणाची पातळी दर्शविणारा फलक लावावा, प्रदूषणाची पातळी वाढल्यास धोक्याची घंटा तेथे वाजवणे गरजेचे आहे, त्याचे नियंत्रण प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात असावे, प्रदूषण मंडळ आणि पोलिसांनी दररोज रात्री गस्त घालावी, एखादा अपघात झाल्यास परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगळी आपत्कालीन सेवा उभारावी, यांसारख्या मागण्या रहिवासी करत आहेत.