अ‍ॅपशहर

डोंबिवलीत रंगला चोर गोविंदा

‌म टा वृत्तसेवा, कल्याणनारळी पौर्णिमेनिमित्त कोकणात चोर गोविदा खेळला जातो यावेळी नारळ लढविण्याचा खेळ चांगलाच रंगतो...

Maharashtra Times 27 Aug 2018, 4:00 am

‌म. टा. वृत्तसेवा, कल्याण

नारळी पौर्णिमेनिमित्त कोकणात चोर गोविदा खेळला जातो. यावेळी नारळ लढविण्याचा खेळ चांगलाच रंगतो. चोर गोविंदापासूनच गोविंदांचा दहीहंडीचा सराव सुरू होतो. कोकणातील ही प्रथा डोंबिवलीकर कोकणवासियांनी जपली असून नारळी पौर्णिमेनिमित्त डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात स्थायिक असलेले कोकणी बांधव नारळ लढविण्याचा खेळ खेळून पारंपरिक पद्धतीने सण साजरा करतात.

डोंबिवलीबरोबरच आजुबाजूच्या शहरातील कोकणी बांधव या कार्यक्रमाला न चुकता हजेरी लावतात. दोघेजण हातात नारळ घेऊन हे नारळ एकमेकांवर आपटतात. ज्याच्या हातातील नारळ फुटेल, तो पराभूत होतो आणि जो नारळ फोडतो तो विजयी होतो. दरवर्षी नारळी पौर्णिमेदिवशी दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत प्रत्येकजण या खेळाचा मनमुराद आनंद लुटतो. यालाच चोर गोविंदा असे म्हणतात.

शेकडो कोकणी बांधवांची हजेरी

शहरात केवळ डोंबिवली पश्चिमेकडील मैदानात चोर गोविंदाचा खेळ रंगतो. या खेळाचे आकर्षण वाढत असून शनिवारी नारळी पौर्णिमेनिमित्त शेकडो कोकणी बांधवांनी डोंबिवली पश्चिमेस एकत्र येत चोर गोविंदा साजरा केला. संध्याकाळनंतर फुटलेल्या नारळाची रास मैदानात जमा झाली होती. हे नारळ उपस्थितांना वाटून देण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज