अ‍ॅपशहर

अंबरनाथ स्टेशनवर गर्दुल्ल्यांचा वावर

रेल्वे विभाग मुंबई आणि उपनगरातील स्थानके स्मार्ट आणि स्वच्छ करण्याच्या घोषणा होत असतानाच, अपुऱ्या मनुष्यबळ आणि दुर्लक्षामुळे अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे कॉलेज विद्यार्थिनी आणि महिलांना या गर्दुल्ल्यांच्या त्रासामुळे स्टेशनावर उभे राहणेही अवघड झाले आहे. मात्र रेल्वेचे अधिकारी आणि पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

Maharashtra Times 20 Dec 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drugist roaming on ambarnath railway station
अंबरनाथ स्टेशनवर गर्दुल्ल्यांचा वावर


रेल्वे विभाग मुंबई आणि उपनगरातील स्थानके स्मार्ट आणि स्वच्छ करण्याच्या घोषणा होत असतानाच, अपुऱ्या मनुष्यबळ आणि दुर्लक्षामुळे अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे कॉलेज विद्यार्थिनी आणि महिलांना या गर्दुल्ल्यांच्या त्रासामुळे स्टेशनावर उभे राहणेही अवघड झाले आहे. मात्र रेल्वेचे अधिकारी आणि पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

अंबरनाथ रेल्वे स्टेशनातून रेल्वे प्रशासनाला महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र या मोबदल्यात रेल्वे प्रशासनाकडून असुविधा मिळत असताना, प्रवाशांच्या त्रासात या गर्दुल्ल्यांच्या त्रासाची भर पडली आहे. स्थानकावर मुंबईच्या दिशेला बसलेले गर्दुल्ले फलाटावरच गांजा ओढणे, लघुशंका करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार करत असतात. तर, कधीकधी हे गर्दुल्ले निर्वस्त्र अवस्थेत झोपलेले असतात. सर्वाधिक गर्दुल्ल्यांचा वावर महिलांच्या शेवटच्या डब्याच्या ठिकाणी सुरू असल्याने येथे ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या महिला प्रवाशांना नाइलाजास्तव हा त्रास सहन करावा लागतो. याबाबत महिला प्रवाशांनी अनेकदा रेल्वे पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी पोलिस स्टेशनाची सुरक्षा आणि प्रवाशांच्या समस्येपेक्षा परिसरातील आणि रेल्वे पुलावरील फेरीवाल्यांकडे पोलिस अधिक लक्ष देत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. त्यामुळे यापूर्वीही स्थानकावर मृत व्यक्तीचे शव गोणीत भरून फलाटावर टाकणे, भिकाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणातून झालेला चाकू हल्ला या घटनांनंतरही पोलिस प्रशासन आणि रेल्वे प्रशासन धडा घेत नसल्याचेच चित्र आहे.


रेल्वे पोलिस अनेकदा कारवाई करतात. मात्र मुंबईच्या दिशेने असलेली सुरक्षा भिंत तोडली गेल्याने तेथून यांना स्थानकावर थेट प्रवेश मिळतो. त्यामुळे त्यांना पूर्णतः रोखणे शक्य नाही. सुरक्षा भिंत बांधल्यानंतर त्यांचा वावर कमी होण्यास मदत होईल.

- जॉय एब्राहम,

प्रबंधक, अंबरनाथ रेल्वे स्थानक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज