म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
इमारतीला पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न घेताच वापर सुरू केल्याप्रकरणी रामचंद्र नगर परिसरातील श्री जिजामाता नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांनी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच वापर परवानगी दिल्यामुळे त्यांच्या विरोधातही वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हॉटेल आणि लाऊंजला नोटिसा आणि पुरेशी मुदत दिल्यानंतर कारवाई केली जाते. मग, आमच्या इमारतीवर अशी तडकाफडकी कारवाई का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या कारवाईमुळे या इमारतीतील कुटुंबांचे हाल सुरू आहेत.
रामचंद्र नगर परिसरातील कामगार रुग्णालयाजवळ येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत ही १९ मजल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. इमारत वास्तव्यासाठी खुली करण्यापूर्वी पालिकेकडून ओसी आणि अग्निशमन दलाकडून एनओसी घेणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक इमारतींमध्ये या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्याच धर्तीवर या १९ मजली इमारतीला ओसी नसतानाही ती बांधकाम व्यावसायिकांनी वास्तव्यासाठी खुली केली होती. परंतु, पालिकेने सोमवारी शहरातील हॉटेल आणि लाऊंजवर कारवाई सुरू असतानाच या इमारतीचे पाणी आणि वीज जोडणी तोडून टाकली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता पालिका निवासी इमारतीवर अशा पद्धतीने कारवाई कशी करू शकते, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या बांधकामांबाबतचा काही वाद न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सोसायटीला एनओसी आणि ओसी मिळू शकलेली नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. वादग्रस्त बांधकामे हटवली जात नसल्याने इमारतीतील रहिवाशांची कोंडी होत असून त्यासाठी झोपडपट्टी विकास कार्यालय आणि संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुस्त सुनील चव्हाण यांना निवेदन दिले असून मानवतेच्या दृष्टिकोनातून १५ दिवसांची मुदत मागण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. इमारतीवर कारवाई झाल्यानंतर मेसर्स अनुदान प्रॉपर्टीज, देव लॅण्ड अॅण्ड हाऊसिंग प्रा. लिचे विजय ठक्कर, मंगलमुर्ती इन्टरप्रायझेस आणि वास्तूविशारद योगेश केळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमातील कलमान्वये गुन्हेसुद्धा पालिकेने दाखल केले आहेत.
इमारतीला पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न घेताच वापर सुरू केल्याप्रकरणी रामचंद्र नगर परिसरातील श्री जिजामाता नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांनी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच वापर परवानगी दिल्यामुळे त्यांच्या विरोधातही वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हॉटेल आणि लाऊंजला नोटिसा आणि पुरेशी मुदत दिल्यानंतर कारवाई केली जाते. मग, आमच्या इमारतीवर अशी तडकाफडकी कारवाई का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या कारवाईमुळे या इमारतीतील कुटुंबांचे हाल सुरू आहेत.
रामचंद्र नगर परिसरातील कामगार रुग्णालयाजवळ येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत ही १९ मजल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. इमारत वास्तव्यासाठी खुली करण्यापूर्वी पालिकेकडून ओसी आणि अग्निशमन दलाकडून एनओसी घेणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक इमारतींमध्ये या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्याच धर्तीवर या १९ मजली इमारतीला ओसी नसतानाही ती बांधकाम व्यावसायिकांनी वास्तव्यासाठी खुली केली होती. परंतु, पालिकेने सोमवारी शहरातील हॉटेल आणि लाऊंजवर कारवाई सुरू असतानाच या इमारतीचे पाणी आणि वीज जोडणी तोडून टाकली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता पालिका निवासी इमारतीवर अशा पद्धतीने कारवाई कशी करू शकते, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या बांधकामांबाबतचा काही वाद न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सोसायटीला एनओसी आणि ओसी मिळू शकलेली नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. वादग्रस्त बांधकामे हटवली जात नसल्याने इमारतीतील रहिवाशांची कोंडी होत असून त्यासाठी झोपडपट्टी विकास कार्यालय आणि संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुस्त सुनील चव्हाण यांना निवेदन दिले असून मानवतेच्या दृष्टिकोनातून १५ दिवसांची मुदत मागण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. इमारतीवर कारवाई झाल्यानंतर मेसर्स अनुदान प्रॉपर्टीज, देव लॅण्ड अॅण्ड हाऊसिंग प्रा. लिचे विजय ठक्कर, मंगलमुर्ती इन्टरप्रायझेस आणि वास्तूविशारद योगेश केळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमातील कलमान्वये गुन्हेसुद्धा पालिकेने दाखल केले आहेत.