अ‍ॅपशहर

विजेला वळीवतडाखा

शुक्रवारी रात्रीच्या वेळी ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पहिल्या पावसाच्या सरींनी अनेकांना आनंदित केले खरे; मात्र त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. सामान्यांच्या आनंदात महावितरणने खोडा घातला. पहिल्या पावसानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे अनेक भागांत अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सामान्यांचा हिरमोड झालाच; पण पहिल्याच पावसात महावितरणच्या नियोजनाचा गोंधळ उघड झाला.

Maharashtra Times 14 May 2017, 3:00 am
जिल्ह्यात अनेक भागांत वीजपुरवठा खंडित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम due to rain power cut in kalyan dombivali
विजेला वळीवतडाखा


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शुक्रवारी रात्रीच्या वेळी ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पहिल्या पावसाच्या सरींनी अनेकांना आनंदित केले खरे; मात्र त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. सामान्यांच्या आनंदात महावितरणने खोडा घातला. पहिल्या पावसानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे अनेक भागांत अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सामान्यांचा हिरमोड झालाच; पण पहिल्याच पावसात महावितरणच्या नियोजनाचा गोंधळ उघड झाला.

काहीवेळासाठीच आलेल्या तुरळक सरींमुळे सामान्य लोक सुखावले होते. मात्र पावसाच्या सरी सुरू होताच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. डोंबिवलीतील काही भागांत तर रात्री जवळपास तीन तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण-ठाण्यातसुद्धा काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरण अधिकाऱ्यांनी चाचपणी करून वीजपुरवठा पूर्ववत केला. केवळ काही वेळासाठी आलेल्या पहिल्या पावसातच ही अवस्था निर्माण झाली तर प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्यावर काय परिस्थिती ओढावणार, असा प्रश्न सामान्यांना यामुळे पडला आहे.

पावसाळ्याआधी विशेष प्रयत्न करून वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणद्वारे प्रयत्न केले जात होते. परंतु पहिल्याच पावसात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हे प्रयत्न फोल ठरल्याचे दिसून येत आहे. रात्री पाऊस सुरू झाल्यावर शहरातील महावितरणच्या यंत्रणेमध्ये बिघाड झाला. विद्युत तारांमधील पिन इन्स्युलेटर्सवर ताण पडला. पावसाचे पाणी या इन्स्युलेटर्सवर पडल्यामुळे त्यामध्ये बिघाड होऊन विद्युतपुरवठा खंडित झाला. आधीच उन्हाळ्याच्या दिवसात लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या सामान्यांना आता पावसाळ्यातसुद्धा त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. याबद्दल उपाययोजना आखण्यात येत असल्या तरीही सामान्यांमध्ये मात्र नाराजी आहे.

नित्याचीच समस्या

याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पावसाच्या पाण्यामुळेच काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणद्वारे देण्यात आली. उन्हाच्या तडाख्यामुळे तापलेल्या विद्युत तारांवर पाणी पडल्यामुळे विद्युत प्रवाहावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा गंभीर परिणाम जाणवू शकतो म्हणून काही वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी पहिल्या पावसावेळी महावितरणला पुरवठ्याकडे लक्ष द्यावे लागते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज