अ‍ॅपशहर

‘मीठ, साखर, तेल कमी खा’

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या विद्यमाने जनतेत सुरक्षित, समतोल व पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी एक मोहीम 'स्वस्थ भारत यात्रा' या नावाने १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहिमेचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीला झेंडा दाखविला. तद्नंतर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वस्थ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी अन्नपदार्थ खाण्याच्या सवयी बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, असे सांगितले.

Maharashtra Times 12 Nov 2018, 11:21 am
म. टा. वृत्तसेवा, भाईंदर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salt


महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या विद्यमाने जनतेत सुरक्षित, समतोल व पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी एक मोहीम 'स्वस्थ भारत यात्रा' या नावाने १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहिमेचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीला झेंडा दाखविला. तद्नंतर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वस्थ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी अन्नपदार्थ खाण्याच्या सवयी बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, असे सांगितले.

जिल्हाधिकारी नार्वेकर याप्रसंगी म्हणाले की, आपल्या पिढीला महात्मा गांधीच्या दांडी यात्रेत सहभागी होता नव्हते आले, पण मीठ, साखर, तेल कमी खा असा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक यात्रेत आपण सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे. शाळा, महाविद्यालये तसेच मॉलमधूनदेखील याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हॉटेल्स आणि उपाहारगृहात लावण्यासाठी १२ सुवर्ण नियम या पत्रिकेचे अनावरणही करण्यात आले.

याप्रसंगी अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी यात्रेचे महत्त्व सांगितले तर कोकण विभाग सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन शिवाजी देसाई यांनी या यात्रेने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात प्रवास केला असून उद्या ती मुंबईत व नंतर पालघर आणि मग पुढे इतर राज्यांतून दिल्लीला पोहोचेल, असे सांगितले. या यात्रेने ६८५ किमी अंतर पूर्ण केले असून त्यात ४०५ सायकलस्वार आहेत, १४ ठिकाणी प्रभात फेऱ्या झाल्या असून १५ हजारांपेक्षा जास्त लोक यात सहभागी झाल्याचे सांगितले. याप्रसंगी रत्नागिरी येथील १६ वर्षीय गार्गी अहिरे हिने दाखविलेल्या योगाच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांची मने जिंकली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज