म. टा. वृत्तसेवा, भाईंदर
भाईंदरमधील अपहरणाचा गुन्हा उघडकीस आला असून याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच आरोपींचा माग काढून त्यांना अटक केल्याने अपहृत कपडा व्यापाऱ्याचे प्राण वाचले, असे पोलिसांनी सांगितले.
२९ सप्टेंबर २०१७ रोजी भाईंदर पश्चिम येथील कपड्याचे व्यापारी जितेंद्र रामेश्वर जोशी (३२, रा.दीडशे फूट रोड, भाईंदर पश्चिम) यांचे रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी अपहरण केले. याबाबत भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याबाबत ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी बारकाईने तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती.
अपहृत इसम जितेंद्र जोशी व भिवंडी येथील कपडा व्यापारी गजानन राघू हरड यांचे व्यापारातील पैशाच्या देवाणघेवाण यावरून वाद आहेत. त्यातूनच जितेंद्र जोशी यांचे अपहरण झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जोशी आरोपीचे ११ लाखांचे देणे लागत होते. मात्र त्यांनी हे पैसे न दिल्याने त्यांचे अपहरण करण्यात आले. गुन्हा करणारे इसम गजानन हरड (३२, रा. भिवंडी), रमेश उर्फ अनिल अगर्दु यादव (३८, रा. भिवंडी), अवधूत शेलार (२७, रा. कल्याण), मयुरेश म्हात्रे (२८, रा. कल्याण), यतीश देसाई (२८, रा. कल्याण), प्रथमेश वालावलकर (२७, रा. डोंबिवली), वरूण अग्रवाल (३२, रा. भाईंदर पश्चिम) यांना ९ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या आरोपींनी अपहृत जितेंद्र जोशी यांना भिवंडी, सोनाळे गावात एका बंद गोडाऊनमध्ये कोंडून ठेवले व मारहाण केली होती. आठ दिवसात जोशी यांना जेवण-पाणी न देता त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आल्याने त्यांची तब्यत अत्यंत नाजूक झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिश्रम घेऊन या गुन्ह्याचा छडा लावला व वेळीच पोहोचत जोशी यांचा जीव वाचवला, याबद्दल तपास पथकाचे कौतुक केल्याचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
भाईंदरमधील अपहरणाचा गुन्हा उघडकीस आला असून याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच आरोपींचा माग काढून त्यांना अटक केल्याने अपहृत कपडा व्यापाऱ्याचे प्राण वाचले, असे पोलिसांनी सांगितले.
२९ सप्टेंबर २०१७ रोजी भाईंदर पश्चिम येथील कपड्याचे व्यापारी जितेंद्र रामेश्वर जोशी (३२, रा.दीडशे फूट रोड, भाईंदर पश्चिम) यांचे रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी अपहरण केले. याबाबत भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याबाबत ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी बारकाईने तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती.
अपहृत इसम जितेंद्र जोशी व भिवंडी येथील कपडा व्यापारी गजानन राघू हरड यांचे व्यापारातील पैशाच्या देवाणघेवाण यावरून वाद आहेत. त्यातूनच जितेंद्र जोशी यांचे अपहरण झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जोशी आरोपीचे ११ लाखांचे देणे लागत होते. मात्र त्यांनी हे पैसे न दिल्याने त्यांचे अपहरण करण्यात आले. गुन्हा करणारे इसम गजानन हरड (३२, रा. भिवंडी), रमेश उर्फ अनिल अगर्दु यादव (३८, रा. भिवंडी), अवधूत शेलार (२७, रा. कल्याण), मयुरेश म्हात्रे (२८, रा. कल्याण), यतीश देसाई (२८, रा. कल्याण), प्रथमेश वालावलकर (२७, रा. डोंबिवली), वरूण अग्रवाल (३२, रा. भाईंदर पश्चिम) यांना ९ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या आरोपींनी अपहृत जितेंद्र जोशी यांना भिवंडी, सोनाळे गावात एका बंद गोडाऊनमध्ये कोंडून ठेवले व मारहाण केली होती. आठ दिवसात जोशी यांना जेवण-पाणी न देता त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आल्याने त्यांची तब्यत अत्यंत नाजूक झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिश्रम घेऊन या गुन्ह्याचा छडा लावला व वेळीच पोहोचत जोशी यांचा जीव वाचवला, याबद्दल तपास पथकाचे कौतुक केल्याचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.