अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांना मनसेचा टोला, 'डोंबिवलीतील खड्ड्यांत दुचाकी चालवणे यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा'

MNS NEWS : गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या निर्णयावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तसंच विद्यार्थी संघटनांचाही विरोध वाढत चालला आहे. आता मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यावरून मनसेने मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2022, 12:37 pm
डोंबिवली : डोंबिवलीत रात्री ११.३० सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहीहंडी कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गोविंदा पथकांसाठी सरकारने जो निर्णय घेतला आहे ते सांगितले. तसेच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला हे ही सांगितले. यावरून आता 'मनसे'ने टोला लगावणारी पोस्ट शेअर केली आहे. डोंबिवलीतील खड्ड्यांत दुचाकी चालवणे यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde dahi handi
डोंबिवलीतील खड्ड्यांत दुचाकी चालवणे यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, मुख्यमंत्र्यांना मनसेचा टोला


कल्याण-डोंबिवली परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याच खड्ड्यातून दुचाकी, गाड्या चालवून नागरिक हैराण झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी आजही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. मुख्यतः टिटवाळा, कल्याण पूर्व, डोंबिवली, २७ गाव येथील रस्त्यांवर खड्डे आहेत. भोपर परिसरात आणि ठाकुर्लीमध्ये रस्ताच दिसत नाही. तर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमएसआरडीसी या रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम होत आहे. कल्याण-शीळ रोडवरील पलावा येथील पूल आणि पलावा जंक्शन येथे खड्डे असल्याने ट्रॅफिक जाम होत आहे. आता यावरून मनसेने मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. मनसे जिल्हा संघटक राहुल कामत यांनी फेसबुक पोस्ट करत ती शेअर केली आहे. यामध्ये डोंबिवलीतील खड्ड्यांत दुचाकी चालवणे यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, अध्यक्ष महोदय... असं म्हणत टोला लगावाला आहे.

थेट आनंद मठात जाऊन आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, 'मलई कोणी खाल्ली?'

मुख्यमंत्री डोंबिवलीत काय म्हणाले होते?

यावर्षी जल्लोषात उत्साहात गोविंदा बाहेर पडलेले आहेत. गेली दोन वर्षे कोविडमुळे सर्व सणांवर मर्यादा होत्या. यावर्षी मात्र सर्व गोविंदाने सगळी कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्याच ठिकाणी प्रचंड मोठा उत्साह मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी सगळीकडे सगळ्या शहरांमध्ये राज्यभरात हाच उत्साह दिसून आला. आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम हे सगळे लोक करतात आणि यावर्षी सरकारच्या माध्यमातून देखील शिवसेना भाजपचे युतीचे सरकारने गोविंदाच्या बाबतीत देखील किंबहुना गणेशोत्सव साजराचा करण्याच्या बाबतीत देखील खूप लवचिक धोरण स्वीकारलं आहे. परवानगी असेल मंडपाचे शुल्क असतील त्यामध्ये सूट दिली, सवलत दिली. गोविंदामध्ये देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्याचबरोबर जखमी गोविंदा होते त्यांच्यासाठी देखील पाच लाख ते साडेसात लाख रुपयांची तरतूद केली. एखाद्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास १० लाख रुपये मदतीची तरतूद केली. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोविंदाला सहासी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे कबड्डी खो-खो इतर जे खेळ आहेत त्याप्रमाणे गोविंदाला देखील एक दर्जा प्राप्त होणारे आणि प्रो गोविंदा देखील पुढच्या वर्षापासून आयोजित केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

रात्री साडेअकरा वाजता खाडी पार करत मुख्यमंत्री डोंबिवलीत; असं काय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज