बीएसयूपीअंतर्गत लाभार्थींना घरांचा ताबा
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानाच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्याात हिस्सा भरलेल्या ३३३ लाभार्थींना गुरुवारी घराचा ताबा देण्यात आला. यात मौजे -कचोरे येथील १३२, इंदिरानगर येथील ५२, इंदिरानगर (समाधानवाडी), डोंबिवली १०७, साठे नगर (उंबर्डे) येथील ४२ लाभार्थींचा समावेश आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत जेएनयूआरएममधून बीएसयूपी योजनेतून सदनिका उभारण्यात आल्या आहेत. ८ वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे लाभार्थी घराच्या प्रतीक्षेत होते. या दरम्यान घराची वारंवार मागणी करणाऱ्या लाभार्थींना महापौर राजेंद्र देवळेकर यांनी १३ जून रोजी दुसऱ्या टप्प्यात कचोरे येथील बीएसयूपी योजनच्या लाभार्थींना ताबापत्रे व चावी वाटप कार्यक्रमांत बाधितांना घर देणे, हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे या योजनेत पात्र लाभार्थींना घरे दिले जातील, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता तिसऱ्या टप्प्यातील घरे वाटपाने करण्यात आली.
आयुक्त ई. रवींद्रन यांनी बीएसयूपी प्रकल्पातील रखडलेल्या इमारतींची कामे वेगाने पूर्ण करून लाभार्थींना घरकुले देण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कचोरे, उंबर्डे येथील ३३३ पात्र लाभार्थींना घरे देण्यात आल्याने त्यांंची दिवाळी हक्काच्या घरात साजरी होणार आहे. या लाभार्थींमध्ये साठेनगर परिसरातील रहिवाशांचे पुनर्वसन उंबर्डे येथे करण्यात आल्यानेे डम्पिंगपासून सुटका झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानाच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्याात हिस्सा भरलेल्या ३३३ लाभार्थींना गुरुवारी घराचा ताबा देण्यात आला. यात मौजे -कचोरे येथील १३२, इंदिरानगर येथील ५२, इंदिरानगर (समाधानवाडी), डोंबिवली १०७, साठे नगर (उंबर्डे) येथील ४२ लाभार्थींचा समावेश आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत जेएनयूआरएममधून बीएसयूपी योजनेतून सदनिका उभारण्यात आल्या आहेत. ८ वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे लाभार्थी घराच्या प्रतीक्षेत होते. या दरम्यान घराची वारंवार मागणी करणाऱ्या लाभार्थींना महापौर राजेंद्र देवळेकर यांनी १३ जून रोजी दुसऱ्या टप्प्यात कचोरे येथील बीएसयूपी योजनच्या लाभार्थींना ताबापत्रे व चावी वाटप कार्यक्रमांत बाधितांना घर देणे, हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे या योजनेत पात्र लाभार्थींना घरे दिले जातील, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता तिसऱ्या टप्प्यातील घरे वाटपाने करण्यात आली.
आयुक्त ई. रवींद्रन यांनी बीएसयूपी प्रकल्पातील रखडलेल्या इमारतींची कामे वेगाने पूर्ण करून लाभार्थींना घरकुले देण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कचोरे, उंबर्डे येथील ३३३ पात्र लाभार्थींना घरे देण्यात आल्याने त्यांंची दिवाळी हक्काच्या घरात साजरी होणार आहे. या लाभार्थींमध्ये साठेनगर परिसरातील रहिवाशांचे पुनर्वसन उंबर्डे येथे करण्यात आल्यानेे डम्पिंगपासून सुटका झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.