म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांच्या विविध समस्या व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक दरबार होत आहे. त्यावेळी माजी सैनिकांच्या विविध अडचणी सोडविण्यात येणार आहेत. ज्या माजी सैनिकांचे सैन्य सेवेबाबत/ निवृत्ती वेतन किंवा नागरी जीवनात आणखी काही वैयक्तिक अडचणी असतील तर ते लेखी स्वरूपात २० सप्टेंबरर्यंत ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय zswo_thane@mahasainik.com ई-मेलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजी सैनिकांनी या कार्यालयात सादर केलेल्या अर्जात माजी सैनिक ओळखपत्र क्रमांक व मोबाइल नंबर यांचा उल्लेख करावा. आपण पाठविलेल्या अडचणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यास दरबारामध्ये बोलावण्यात येणार असून ज्या माजी सैनिकांनी/विधवांनी अर्जाद्वारे अडचणी या कार्यालयात कळविल्या आहेत, त्यांनी प्रत्यक्ष दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरबारात उपस्थित माजी सैनिकांच्या अडचणींचे तात्काळ निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी दरबारामध्ये उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर यांनी केले आहे. सैनिक दरबार घेण्याची तारीख, वेळ व स्थळ नंतर कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
पालघर जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांच्या विविध समस्या व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक दरबार होत आहे. त्यावेळी माजी सैनिकांच्या विविध अडचणी सोडविण्यात येणार आहेत. ज्या माजी सैनिकांचे सैन्य सेवेबाबत/ निवृत्ती वेतन किंवा नागरी जीवनात आणखी काही वैयक्तिक अडचणी असतील तर ते लेखी स्वरूपात २० सप्टेंबरर्यंत ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय zswo_thane@mahasainik.com ई-मेलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजी सैनिकांनी या कार्यालयात सादर केलेल्या अर्जात माजी सैनिक ओळखपत्र क्रमांक व मोबाइल नंबर यांचा उल्लेख करावा. आपण पाठविलेल्या अडचणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यास दरबारामध्ये बोलावण्यात येणार असून ज्या माजी सैनिकांनी/विधवांनी अर्जाद्वारे अडचणी या कार्यालयात कळविल्या आहेत, त्यांनी प्रत्यक्ष दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरबारात उपस्थित माजी सैनिकांच्या अडचणींचे तात्काळ निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी दरबारामध्ये उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर यांनी केले आहे. सैनिक दरबार घेण्याची तारीख, वेळ व स्थळ नंतर कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.