नागपूर, पुणे, गोव्यात एकाच वेळी पोलिसांचे छापे; निवृत्त सैनिकासह १८ जणांना अटक
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री नागपूर, पुणे, गोवा याठिकाणी एकाच वेळी छापे टाकून एका निवृत्त सैनिकासह संस्थाचालक, एजंट अशा एकूण १८ जणांना अटक केली आहे. तसेच ३५० परीक्षार्थींनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असून त्यांच्यात पुण्यातील ७९, नागपूरमधील २२२ आणि गोव्यातील ४९ परीक्षार्थींचा समावेश आहे.
जनरल ड्युटी (जीडी), टेक्निकल, क्लार्क आणि ट्रेड्समन या पदांसाठी आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाकडून रविवार, २६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, वेगवेगळ्या झोननुसार होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका अगोदरच फुटल्याची आणि तिच्यी प्रती चार ते पाच लाख रुपयांना विकल्या जात असल्याची माहिती ठाणे जिल्ह्यातील एका क्लासचालकाने ठाणे गुन्हे शाखेला दिली. गुन्हे शाखेने तात्काळ सूत्रे हलवत चार पथके नाशिक, नागपूर, पुणे आणि गोवा याठिकाणी रवाना केली. सर्व पथकांमध्ये मिळून ८० जणांचा फौजफाटा होता.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकत प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या आरोपींसह परीक्षार्थीना ताब्यात घेतले. नाशिकला पोलिसांच्या हाती काही लागले नाही. नागपूरमध्ये अजनीतील सुयोगनगर येथील मौर्य सभागृहात छापा टाकून अकोल्यातील करियर अकादमीचा संचालक निवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे, टँगो चार्ली अकादमीचा संचालक जयकुमार बेलखेडे, संदीप भुजबळ, फलटण येथील संतोष शिंदे, पंढरपूर येथील संदीप सदाशिव फरतडे, नगरमधील प्रसाद धनोरे, वैभव भास्कर सिसोदे, ससंदीप बबन नागरे व नाशिक येथील किरण गामने यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन कार, ११ मोबाइल, टॅब असा एकूण दहा लाखांचा ऐवजही जप्त केला. पुण्यातील फुरसुंगीमध्ये छापा मारून आप्पा जाधव याच्यासह ९ जण आणि ७९ परीक्षार्थी ताब्यात घेण्यात आले. गोव्यातील म्हापसा याठिकाणी बागातोर बीच परिसरातून रणजीत जाधव याच्यासह ३ जण आणि ४९ परीक्षार्थीना ताब्यात घेण्यात आले, अशी महिती पोलिस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
सहा केंद्रांवरील परीक्षा रद्द
नवी दिल्ली ः या पेपरफुटीची अंतर्गत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश लष्कराकडून देण्यात आले आहेत. या गैरव्यवहारात लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नसल्याचे ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पेपरफुटीनंतर काम्प्टी, नागपूर, अहमदनगर, अहमदाबाद, गोवा आणि किर्की या केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आली.
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री नागपूर, पुणे, गोवा याठिकाणी एकाच वेळी छापे टाकून एका निवृत्त सैनिकासह संस्थाचालक, एजंट अशा एकूण १८ जणांना अटक केली आहे. तसेच ३५० परीक्षार्थींनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असून त्यांच्यात पुण्यातील ७९, नागपूरमधील २२२ आणि गोव्यातील ४९ परीक्षार्थींचा समावेश आहे.
जनरल ड्युटी (जीडी), टेक्निकल, क्लार्क आणि ट्रेड्समन या पदांसाठी आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाकडून रविवार, २६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, वेगवेगळ्या झोननुसार होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका अगोदरच फुटल्याची आणि तिच्यी प्रती चार ते पाच लाख रुपयांना विकल्या जात असल्याची माहिती ठाणे जिल्ह्यातील एका क्लासचालकाने ठाणे गुन्हे शाखेला दिली. गुन्हे शाखेने तात्काळ सूत्रे हलवत चार पथके नाशिक, नागपूर, पुणे आणि गोवा याठिकाणी रवाना केली. सर्व पथकांमध्ये मिळून ८० जणांचा फौजफाटा होता.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकत प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या आरोपींसह परीक्षार्थीना ताब्यात घेतले. नाशिकला पोलिसांच्या हाती काही लागले नाही. नागपूरमध्ये अजनीतील सुयोगनगर येथील मौर्य सभागृहात छापा टाकून अकोल्यातील करियर अकादमीचा संचालक निवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे, टँगो चार्ली अकादमीचा संचालक जयकुमार बेलखेडे, संदीप भुजबळ, फलटण येथील संतोष शिंदे, पंढरपूर येथील संदीप सदाशिव फरतडे, नगरमधील प्रसाद धनोरे, वैभव भास्कर सिसोदे, ससंदीप बबन नागरे व नाशिक येथील किरण गामने यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन कार, ११ मोबाइल, टॅब असा एकूण दहा लाखांचा ऐवजही जप्त केला. पुण्यातील फुरसुंगीमध्ये छापा मारून आप्पा जाधव याच्यासह ९ जण आणि ७९ परीक्षार्थी ताब्यात घेण्यात आले. गोव्यातील म्हापसा याठिकाणी बागातोर बीच परिसरातून रणजीत जाधव याच्यासह ३ जण आणि ४९ परीक्षार्थीना ताब्यात घेण्यात आले, अशी महिती पोलिस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
सहा केंद्रांवरील परीक्षा रद्द
नवी दिल्ली ः या पेपरफुटीची अंतर्गत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश लष्कराकडून देण्यात आले आहेत. या गैरव्यवहारात लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नसल्याचे ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पेपरफुटीनंतर काम्प्टी, नागपूर, अहमदनगर, अहमदाबाद, गोवा आणि किर्की या केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आली.