अ‍ॅपशहर

शेतकरी होणार ‘स्मार्ट’

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. तंत्रज्ञानाची कास धरत विकसित होताना दिसत आहेत. असे असताना कृषीक्षेत्रही मागे राहिलेले नाही. पारंपरिक शेतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीने शेती करण्यास शेतकरी अनुकूल बनला आहे. पालघर जिल्ह्यातील आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आता मोबाइलच्या माध्यमातून शेतीचा बाजारभाव, बियाणे पेरण्याच्या पद्धती, हवामानाचा अंदाज समजणार आहे. आयसीटी तंत्रज्ञामुळे आता हे सारे शक्य होणार असून तब्बल ३२ हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

Maharashtra Times 25 Feb 2017, 4:00 am
आयसीटी तंत्रज्ञानाद्वारे मिळणार हवामानाची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer will be more smart
शेतकरी होणार ‘स्मार्ट’


पंकज चव्हाण, ठाणे

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. तंत्रज्ञानाची कास धरत विकसित होताना दिसत आहेत. असे असताना कृषीक्षेत्रही मागे राहिलेले नाही. पारंपरिक शेतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीने शेती करण्यास शेतकरी अनुकूल बनला आहे. पालघर जिल्ह्यातील आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आता मोबाइलच्या माध्यमातून शेतीचा बाजारभाव, बियाणे पेरण्याच्या पद्धती, हवामानाचा अंदाज समजणार आहे. आयसीटी तंत्रज्ञामुळे आता हे सारे शक्य होणार असून तब्बल ३२ हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

दक्षिण आशियातील शेती संशोधक संस्था बिसा आणि पालघरमध्ये काम करणारी प्रगती प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या हवामान बदलावरील शेती या प्रकल्पातील हे पुढचे पाऊल मानले जात आहे. आतापर्यंत शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊन पारंपरिक पावसाच्या संकेतावर शेतात बियाणे पेरायचा, काहीवेळा त्याचा अंदाच बरोबर यायचाही, मात्र बहुतांश वेळा तो चुकायचा. बियाणे पेरून झाल्यावर पाऊस दडी मारायचा आणि शेतकऱ्याचे नुकसान व्हायचे. यातून निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्याही घटना घडल्या आहेत. हे रोखण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे शेतकऱ्याला हवामानाच्या बदलाचा अंदाज मिळणार आहे. तसा शेतीचा प्रयोग सध्या पालघरमध्ये यशस्वी होताना दिसत आहे.

आतापर्यंत पालघरमधील ३२ हजार शेतकऱ्यांचे मोबाइल नंबर मिळाले आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन आहेत, तर काही शेतकऱ्यांकडे साधे फोन आहेत. आयसीटी तंत्रज्ञान वापरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या स्थानिक भाषेत शेतीविषयक माहिती मिळणार आहे. कोणत्या शेतात कोणते पिक घेतल्याने शेतीचे उत्पादन जास्त प्रमाणात वाढेल, तर साधारण पाऊस पडण्याचा कालावधी काय असेल, अशी माहिती शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान आधार बनणार आहे.

गावातील निवडक शेतकऱ्यांचे गट

या आधुनिक शेतीची माहिती आणि आयसीटी तंत्रज्ञानाची माहिती संस्थेच्या वतीने कार्यशाळा घेऊन देण्यात येत आहे. गावातील निवडक शेतकऱ्याचे गट तयार करून शेतीविषयक असणारी तांत्रिक माहिती देण्यात येते. या गटाच्या माध्यमातून त्यांच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती देण्यात येते. अशा प्रकारे माहिती देवाण-घेवाण करण्यासाठी एक प्रकारे साखळी करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज