म. टा. वृत्तसेवा, वसई
वसई-विरार भागांत वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे वसई पूर्व भागातील चिंचपाडा येथे विजेचा खांब व तारांना आग लागल्याची घटना घडली. यामुळे या भागातील वीजपुरवठा बुधवारी खंडित झाला.
वसई पूर्वेकडील भागात चिंचपाडा परिसर आहे. या परिसरातून महावितरणच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. बुधवारी पावसाचा जोर अधिक असल्याने वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले होते. त्यामुळे विद्युतवाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या उडून ही आग लागली होती. या लागलेल्या आगीची माहिती महावितरण विभागाला देण्यात आली होती. तसेच, खांबाच्या बाजूला दुकाने आहेत. वाहनेसुद्धा या भागात उभी केलेली असतात. मात्र या भागात त्यावेळेस या खांबाखाली कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
वसई-विरार भागांत वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे वसई पूर्व भागातील चिंचपाडा येथे विजेचा खांब व तारांना आग लागल्याची घटना घडली. यामुळे या भागातील वीजपुरवठा बुधवारी खंडित झाला.
वसई पूर्वेकडील भागात चिंचपाडा परिसर आहे. या परिसरातून महावितरणच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. बुधवारी पावसाचा जोर अधिक असल्याने वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले होते. त्यामुळे विद्युतवाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या उडून ही आग लागली होती. या लागलेल्या आगीची माहिती महावितरण विभागाला देण्यात आली होती. तसेच, खांबाच्या बाजूला दुकाने आहेत. वाहनेसुद्धा या भागात उभी केलेली असतात. मात्र या भागात त्यावेळेस या खांबाखाली कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.