म. टा. वृत्तसेवा, ठाणे
दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातून पाच किशोरवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलींमध्ये दोन सख्या बहिणीदेखील असून या प्रकरणी अपहरणाची तक्रार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आली आहे.
कळव्यातील खारेगाव नाका परिसरात राहणाऱ्या १६ आणि १५ वर्षांच्या दोन सख्या बहिणी बारावी आणि दहावी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी इस्त्री करत असताना साडी जळाली, त्यामुळे या दोघींना आई रागवली. त्यामुळे या मुली घर सोडून निघून गेल्या आहेत. मुली घरी परत येतील, या समजुतीने पालकांनी अधिक लक्ष दिले नाही. परंतु बराच वेळ होऊनही मुली न आल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी आसपास शोध घेतला. मात्र मुली न सापडल्याने मुलींच्या अपहरणाची तक्रार कळवा पोलिस ठाण्यात केली. सकाळी दहा वाजल्यापासून या मुली बेपत्ता असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर, कळव्यातील शास्त्रीनगरमधून १६ वर्षांची एक मुलगीदेखील गुरुवारी बेपत्ता झाली आहे. ही मुलगी घरात कोणालाच न सांगता निघून गेली असून तिचे नववी इयत्तेपर्यंत शिक्षण झाले आहे. ब्रह्मांडमधूनही १७ वर्षांची मुलगी शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडली. रात्री नऊ वाजले तरी घरी आली नाही. मुलीचे वडील रिक्षाचालक असून भावाने दिलेल्या तक्रारीनंतर कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. वागळे इस्टेटमधूनही १५ वर्षांची एक किशोरवयीन मुलगीदेखील घरातून गायब झाली आहे. जाताना ती दोन ड्रेस घेऊन गेली आहे. श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातून पाच किशोरवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलींमध्ये दोन सख्या बहिणीदेखील असून या प्रकरणी अपहरणाची तक्रार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आली आहे.
कळव्यातील खारेगाव नाका परिसरात राहणाऱ्या १६ आणि १५ वर्षांच्या दोन सख्या बहिणी बारावी आणि दहावी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी इस्त्री करत असताना साडी जळाली, त्यामुळे या दोघींना आई रागवली. त्यामुळे या मुली घर सोडून निघून गेल्या आहेत. मुली घरी परत येतील, या समजुतीने पालकांनी अधिक लक्ष दिले नाही. परंतु बराच वेळ होऊनही मुली न आल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी आसपास शोध घेतला. मात्र मुली न सापडल्याने मुलींच्या अपहरणाची तक्रार कळवा पोलिस ठाण्यात केली. सकाळी दहा वाजल्यापासून या मुली बेपत्ता असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर, कळव्यातील शास्त्रीनगरमधून १६ वर्षांची एक मुलगीदेखील गुरुवारी बेपत्ता झाली आहे. ही मुलगी घरात कोणालाच न सांगता निघून गेली असून तिचे नववी इयत्तेपर्यंत शिक्षण झाले आहे. ब्रह्मांडमधूनही १७ वर्षांची मुलगी शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडली. रात्री नऊ वाजले तरी घरी आली नाही. मुलीचे वडील रिक्षाचालक असून भावाने दिलेल्या तक्रारीनंतर कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. वागळे इस्टेटमधूनही १५ वर्षांची एक किशोरवयीन मुलगीदेखील घरातून गायब झाली आहे. जाताना ती दोन ड्रेस घेऊन गेली आहे. श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.