ठाणे शहरामध्ये गेल्या वर्षी तब्बल ७०० वृक्ष कोसळले होते. त्यामुळे विविध प्रकारचे नुकसानही झाले होते. त्यातून धडा घेत ठाणे महापालिकेने वृक्षसंवर्धनाच्या उपायांसाठी तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून विविध उपाययोजनांचा अहवाल मागवला. या अहवालामध्ये वृक्षांची काळजी घेण्याच्या दृष्टीने अनेक चांगले उपाय सुचवण्यात आले आहेत. या उपायांच्या अंमलबजावणीत महापालिका, खासगी संस्था, नागरिक अशा सगळ्याच घटकांनी सक्रिय सहभागी होण्याची सूचना अहवालात आहे. वृक्षांच्या मुळांवर घातला जाणारा सिमेंट आणि काँक्रिटचा भराव काढा, वृक्षांच्या खोडालगत व मुळालगत तीन बाय तीन फुटांच्या मोकळ्या जागा ठेवा, अशा सूचनाही अहवालात आहेत. या सूचना वृक्षांचे जतन आणि वाढ होण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरी त्याचे पालन होण्याची गरज आहे. महापालिकेने केवळ अहवाल मागवून तो बंदिस्त करण्यापेक्षा त्या सूचनांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. या उपायांचे पालन झाल्यास अचानक कोसळणाऱ्या वृक्षांच्या संख्येत घट होऊन होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल.
सूचनांचे पालन व्हावे
ठाणे शहरामध्ये गेल्या वर्षी तब्बल ७०० वृक्ष कोसळले होते त्यामुळे विविध प्रकारचे नुकसानही झाले होते...
Maharashtra Times 23 May 2018, 4:00 am