म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाणेरी प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या सभेत पाणेरी वाचवा संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनाच सहभागी होऊ न दिल्याने समितीसह समस्त माहीमवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाणेरी प्रश्नावर नियोजित कार्यवाही करण्यास जाणीवपूर्वक विलंब करीत असलेल्या प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रियाही माहीमवासीयांकडून व्यक्त होत आहे.
पाणेरी प्रदूषणाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून माहीमवासीयांचा लढा सुरू आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होण्याऐवजी सभा आयोजित करून केवळ आश्वासन देण्यावरच भर असतो. अशातच गुरुवार, ४ जुलै रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाणेरी प्रदूषणावर चर्चा विनिमय करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेस पाणेरी वाचवा संघर्ष समितीचे प्रमुख नीलेश म्हात्रे यांना निमंत्रित केले होते. मात्र पूर्वनियोजित अन्य कार्यक्रमांमुळे निलेश म्हात्रे स्वतः या सभेस उपस्थित राहू शकणार नसल्याने त्यांनी त्यांच्या सहकारी प्रतिनिधींना सदर सभेस उपस्थित राहू देण्याबाबत उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांना कळविले होते. त्यांची ही विनंती मान्यही करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यावर गजरे यांनी पाणेरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी म्हणून सभेस उपस्थित असलेल्या दीपक भंडारी आणि अन्य दोन सदस्यांना सभेत सहभागी होण्यास नकार देत सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.
दीपक भंडारी हे संघर्ष समितीचे सक्रिय कार्यकर्ते असून यापूर्वी प्रतिनिधी म्हणून त्यांनी अशा अनेक सभांना उपस्थित राहून समितीची बाजू मांडली आहे. असे असताना गुरुवारच्या सभेतून त्यांना बाहेर जाण्यास सांगणाऱ्या गजरे यांची भूमिका अनाकलनीय आणि हेतुपुरस्सर असल्याची प्रतिक्रिया समितीने व्यक्त केली आहे. या घटनेची तक्रार दीपक भंडारी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य संबंधित मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे ईमेल आणि पत्राद्वारे केली आहे.
पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाणेरी प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या सभेत पाणेरी वाचवा संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनाच सहभागी होऊ न दिल्याने समितीसह समस्त माहीमवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाणेरी प्रश्नावर नियोजित कार्यवाही करण्यास जाणीवपूर्वक विलंब करीत असलेल्या प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रियाही माहीमवासीयांकडून व्यक्त होत आहे.
पाणेरी प्रदूषणाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून माहीमवासीयांचा लढा सुरू आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होण्याऐवजी सभा आयोजित करून केवळ आश्वासन देण्यावरच भर असतो. अशातच गुरुवार, ४ जुलै रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पाणेरी प्रदूषणावर चर्चा विनिमय करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेस पाणेरी वाचवा संघर्ष समितीचे प्रमुख नीलेश म्हात्रे यांना निमंत्रित केले होते. मात्र पूर्वनियोजित अन्य कार्यक्रमांमुळे निलेश म्हात्रे स्वतः या सभेस उपस्थित राहू शकणार नसल्याने त्यांनी त्यांच्या सहकारी प्रतिनिधींना सदर सभेस उपस्थित राहू देण्याबाबत उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांना कळविले होते. त्यांची ही विनंती मान्यही करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यावर गजरे यांनी पाणेरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी म्हणून सभेस उपस्थित असलेल्या दीपक भंडारी आणि अन्य दोन सदस्यांना सभेत सहभागी होण्यास नकार देत सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले.
दीपक भंडारी हे संघर्ष समितीचे सक्रिय कार्यकर्ते असून यापूर्वी प्रतिनिधी म्हणून त्यांनी अशा अनेक सभांना उपस्थित राहून समितीची बाजू मांडली आहे. असे असताना गुरुवारच्या सभेतून त्यांना बाहेर जाण्यास सांगणाऱ्या गजरे यांची भूमिका अनाकलनीय आणि हेतुपुरस्सर असल्याची प्रतिक्रिया समितीने व्यक्त केली आहे. या घटनेची तक्रार दीपक भंडारी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य संबंधित मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे ईमेल आणि पत्राद्वारे केली आहे.