ठाणे : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या तथाकथित समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर काही दिवसांपूर्वी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिटा तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणात अद्याप रिदा रशीद यांना अटक झालेली नाही. काल रिदा रशीद नागपूर येथे विधानभवानाच्या आवारात फिरताना आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी काही पत्रकारांसोबत बातचीत देखील केली. यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवले आहे. त्यांच्या मागे अशी कोणती शक्ती आहे की, ती पोलिसांना किंवा कोणालाच घाबरत नाही. उजळ माथ्याने ती फिरते. या महिलेला राजकारणाच्या हितासाठी काही नेत्यांनी हाताशी धरले आहे, असा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणी आव्हाड यांनी संताप व्यक्त करत एक ट्विट देखील केले आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात स्थानिक आमदार व राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या तथाकथित समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर देखील मुंब्रा पोलीस ठाण्यात प्रथम अॅट्रॉसिटी आणि नंतर पिटा तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
क्लिक करा आणि वाचा- तुमच्या विभागाने मला फसवले आहे, फेक शिक्षणाधिकारी महिलेने घातला गोंधळ, केले गंभीर आरोप
या प्रकरणी सध्या मुंब्रा पोलीस ठाण्यात तपास सुरू असला तरी रिदा रशीद यांना अटक करण्यात आलेली नाही. हे सगळं सुरु असताना रिदा रशीद नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुक्तपणे फिरताना आढळून आल्या. यावर संताप व्यक्त करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. 'पोलिस तिला अटक का करत नाहीत?, तिच्यासाठी वेगळे कायदे आहेत का? सेक्स रैकेट चालवायची असा आरोप करत पोलिसांची नातेवाईक आहे का?' असा सवाल या ट्विटच्या माध्यमातून आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी आव्हाडांशी संपर्क साधला असता आव्हाडा यांनी सांगितले की, मुंब्रा येथे सेक्स रॅकेट आणि अल्पवयीन मुलींना त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन वेशा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेविरुद्ध काही महिलांनीच गुन्हा दाखल केला, ज्यांचा उपयोग त्या महिलेने करून घेतला. काल काही पत्रकार मित्रांशी बोलताना तिने सांगितले की, मी वरिष्ठ मंत्र्यांना भेटली आहे आणि मुक्तपणे आवारात फिरत होती, कुठेही बसत होती. लोकशाहीच्या मंदिरात इतका घाणेरडा आरोप झालेली महिला येते. तिच्या मागे अशी कोणती शक्ती आहे की ती पोलिसांनाही घाबरत नाही... कोणालाच घाबरत नाही. उजळ माथ्यानी ती फिरते. याचा अर्थ किती व्यक्तिगत राजकारणाचे विष पेरल गेले आहे हे स्पष्ट होते. राजकारणात आपण कोणाला हाताशी धरले आहे याचे भान सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी ठेवलं पाहिजे, असं आव्हाडांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- ‘लवासा’ प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात; पवार, सुळेंविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश देण्याची विनंती
रिदा रशीद या विधानसभेत मुक्तपणे फिरत होत्या. त्यांच्यासोबत जो कोणी फिरत होता त्याचे नाव काय आहे, तो कोणाचा कोण आहे, हे अख्या विधानसभेला माहिती असल्याचे आव्हाड म्हणाले. ज्या महिलेच्या विरोधात पिटा तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत ती विधानसभेत गेली कशी? तिला विधानसभेत फिरण्यासाठी पास कोणी दिला? असे प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले आहेत. रशीद यांना दिलेल्या पासवरून तिच्या मागे कोण आहे हे स्पष्ट होईल, असेही आव्हाड म्हणाले.
तसेच असे गुन्हेगार सभागृहात येतातच कसे?, तिने अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती सगळ्यांना असताना तिला नेते लोकांची भेट कशी मिळते? असे सवाल उपस्थित करत आव्हाड यांनी ही घाणेरडी आणि विकृती वृत्ती असल्याचे सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई महापालिकेत राडा; शिंदे गटाने पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्याने तणाव, दोन्ही गट आमने-सामने
ही तीच महिला आहे जिने माझ्या विरोधात १५ मिनिटांत गुन्हा दाखल केला होता. याचा अर्थ असा आहे की, माझ्या विरोधात गुन्हा दाखल करणारी जी व्यक्ती होती जिने त्यात इंटरेस्ट घेतला त्या महिलेला अजून अटक कशी होत नाही?. म्हणजेच तीच व्यक्ती या महिलेला विधानसभेत प्रवेश द्यायला मदत करत असणार आणि तीच व्यक्ती अटक करू नका असा दबाव पोलिसांवर टाकत असणार, असा प्रश्न देखील आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- तुमच्या विभागाने मला फसवले आहे, फेक शिक्षणाधिकारी महिलेने घातला गोंधळ, केले गंभीर आरोप
या प्रकरणी सध्या मुंब्रा पोलीस ठाण्यात तपास सुरू असला तरी रिदा रशीद यांना अटक करण्यात आलेली नाही. हे सगळं सुरु असताना रिदा रशीद नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुक्तपणे फिरताना आढळून आल्या. यावर संताप व्यक्त करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. 'पोलिस तिला अटक का करत नाहीत?, तिच्यासाठी वेगळे कायदे आहेत का? सेक्स रैकेट चालवायची असा आरोप करत पोलिसांची नातेवाईक आहे का?' असा सवाल या ट्विटच्या माध्यमातून आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी आव्हाडांशी संपर्क साधला असता आव्हाडा यांनी सांगितले की, मुंब्रा येथे सेक्स रॅकेट आणि अल्पवयीन मुलींना त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन वेशा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेविरुद्ध काही महिलांनीच गुन्हा दाखल केला, ज्यांचा उपयोग त्या महिलेने करून घेतला. काल काही पत्रकार मित्रांशी बोलताना तिने सांगितले की, मी वरिष्ठ मंत्र्यांना भेटली आहे आणि मुक्तपणे आवारात फिरत होती, कुठेही बसत होती. लोकशाहीच्या मंदिरात इतका घाणेरडा आरोप झालेली महिला येते. तिच्या मागे अशी कोणती शक्ती आहे की ती पोलिसांनाही घाबरत नाही... कोणालाच घाबरत नाही. उजळ माथ्यानी ती फिरते. याचा अर्थ किती व्यक्तिगत राजकारणाचे विष पेरल गेले आहे हे स्पष्ट होते. राजकारणात आपण कोणाला हाताशी धरले आहे याचे भान सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी ठेवलं पाहिजे, असं आव्हाडांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- ‘लवासा’ प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात; पवार, सुळेंविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश देण्याची विनंती
रिदा रशीद या विधानसभेत मुक्तपणे फिरत होत्या. त्यांच्यासोबत जो कोणी फिरत होता त्याचे नाव काय आहे, तो कोणाचा कोण आहे, हे अख्या विधानसभेला माहिती असल्याचे आव्हाड म्हणाले. ज्या महिलेच्या विरोधात पिटा तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत ती विधानसभेत गेली कशी? तिला विधानसभेत फिरण्यासाठी पास कोणी दिला? असे प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले आहेत. रशीद यांना दिलेल्या पासवरून तिच्या मागे कोण आहे हे स्पष्ट होईल, असेही आव्हाड म्हणाले.
तसेच असे गुन्हेगार सभागृहात येतातच कसे?, तिने अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती सगळ्यांना असताना तिला नेते लोकांची भेट कशी मिळते? असे सवाल उपस्थित करत आव्हाड यांनी ही घाणेरडी आणि विकृती वृत्ती असल्याचे सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई महापालिकेत राडा; शिंदे गटाने पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्याने तणाव, दोन्ही गट आमने-सामने
ही तीच महिला आहे जिने माझ्या विरोधात १५ मिनिटांत गुन्हा दाखल केला होता. याचा अर्थ असा आहे की, माझ्या विरोधात गुन्हा दाखल करणारी जी व्यक्ती होती जिने त्यात इंटरेस्ट घेतला त्या महिलेला अजून अटक कशी होत नाही?. म्हणजेच तीच व्यक्ती या महिलेला विधानसभेत प्रवेश द्यायला मदत करत असणार आणि तीच व्यक्ती अटक करू नका असा दबाव पोलिसांवर टाकत असणार, असा प्रश्न देखील आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला आहे.