म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
आर्थिक वर्षातील जवळपास सहा महिने उलटल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्तांनी सादर केलेला ३ हजार ६९५ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेने ४ हजार ३९ कोटींपर्यंत फुगविला होता. ही वाढ प्रशासनाला मान्य नसल्याने तिढा निर्माण झाला होता. तो तिढा आता सुटला असून पालिकेच्या अर्थसंकल्पाने पहिल्यांदाच ४ हजार कोटींचा पल्ला ओलांडला आहे. अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी नसल्याने आजवर रखडलेल्या कामांचा मार्ग प्रशस्त होणार असून सर्वपक्षीय नगरसेवकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
काही वर्षांपासून पालिकेचा अर्थसंकल्प निर्धारीत वेळेत मंजूर करून त्यानुसार अंमलबवाजणी होत नाही. आयुक्त आणि लोकप्रतिनिधींमधील वादात कायम शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागत असे. मात्र, यंदा महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृहनेते नरेश म्हस्के यांनीच आयुक्तांशी वाटाघाटी करून वाद मिटविण्यात यश मिळवले आहे. सर्वसाधारण सभेने वाढ सुचविलेल्या बहुतांश प्रस्तावांना आयुक्तांनी मंजुरी दिली. शहरांतील नवी शौचालयांची उभारणी आणि जुन्यांच्या दुरुस्तीसाठी नगरसेवक आग्रही होते. त्यासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी सुमारे ८० कोटी, स्मशानभूमींसाठी ६ कोटी, पार्किंगसाठी तीन कोटी आदी नगरसेवकांनी सुचविलेले वाढीचे प्रस्तावही मंजूर झाले आहेत.
नगरसेवकांना लॉटरी
पालिका आयुक्तांनी नगरसेवक निधीसाठी प्रत्येकी ३० लाखांची तरतूद केली होती. मात्र, हा निधी अत्यंत अपुरा असल्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा आक्षेप होता. प्रभाग सुधारणा निधी आणि नगरसेवक निधी मिळून किमान एक कोटी रुपये प्रत्येक नगरसेवकाला हवे होते. तसा ठरावही सभेने केला होता. बरेच आढेवेढे घेतल्यानंतर आयुक्तांनी हा निधी ८० लाखांपर्यंत वाढविण्यास होकार दर्शविला आहे. त्याशिवाय महापौर निधीतही १० कोटींची घसघशीत तरतूद करण्यात आली. त्या निधीतील गतवर्षीचे शिल्लक ६ कोटीसुद्धा यंदा मिळणार आहेत. तसेच, महापौर रजनी आणि ठाणे फेस्टिव्हलसाठीसुद्धा ४ कोटींची तरतूद केली आहे. गतवर्षी हे कार्यक्रम करण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न निधीअभावी फसला होता.
आर्थिक वर्षातील जवळपास सहा महिने उलटल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्तांनी सादर केलेला ३ हजार ६९५ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेने ४ हजार ३९ कोटींपर्यंत फुगविला होता. ही वाढ प्रशासनाला मान्य नसल्याने तिढा निर्माण झाला होता. तो तिढा आता सुटला असून पालिकेच्या अर्थसंकल्पाने पहिल्यांदाच ४ हजार कोटींचा पल्ला ओलांडला आहे. अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी नसल्याने आजवर रखडलेल्या कामांचा मार्ग प्रशस्त होणार असून सर्वपक्षीय नगरसेवकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
काही वर्षांपासून पालिकेचा अर्थसंकल्प निर्धारीत वेळेत मंजूर करून त्यानुसार अंमलबवाजणी होत नाही. आयुक्त आणि लोकप्रतिनिधींमधील वादात कायम शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागत असे. मात्र, यंदा महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृहनेते नरेश म्हस्के यांनीच आयुक्तांशी वाटाघाटी करून वाद मिटविण्यात यश मिळवले आहे. सर्वसाधारण सभेने वाढ सुचविलेल्या बहुतांश प्रस्तावांना आयुक्तांनी मंजुरी दिली. शहरांतील नवी शौचालयांची उभारणी आणि जुन्यांच्या दुरुस्तीसाठी नगरसेवक आग्रही होते. त्यासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी सुमारे ८० कोटी, स्मशानभूमींसाठी ६ कोटी, पार्किंगसाठी तीन कोटी आदी नगरसेवकांनी सुचविलेले वाढीचे प्रस्तावही मंजूर झाले आहेत.
नगरसेवकांना लॉटरी
पालिका आयुक्तांनी नगरसेवक निधीसाठी प्रत्येकी ३० लाखांची तरतूद केली होती. मात्र, हा निधी अत्यंत अपुरा असल्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा आक्षेप होता. प्रभाग सुधारणा निधी आणि नगरसेवक निधी मिळून किमान एक कोटी रुपये प्रत्येक नगरसेवकाला हवे होते. तसा ठरावही सभेने केला होता. बरेच आढेवेढे घेतल्यानंतर आयुक्तांनी हा निधी ८० लाखांपर्यंत वाढविण्यास होकार दर्शविला आहे. त्याशिवाय महापौर निधीतही १० कोटींची घसघशीत तरतूद करण्यात आली. त्या निधीतील गतवर्षीचे शिल्लक ६ कोटीसुद्धा यंदा मिळणार आहेत. तसेच, महापौर रजनी आणि ठाणे फेस्टिव्हलसाठीसुद्धा ४ कोटींची तरतूद केली आहे. गतवर्षी हे कार्यक्रम करण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न निधीअभावी फसला होता.