अ‍ॅपशहर

ठाणे: भीषण अपघातात चार ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीतील माणकोलीजवळ आज भरधाव एसयूव्ही कार आणि ठाणे परिवहन सेवेच्या बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

Maharashtra Times 12 Sep 2017, 5:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम four die in road accident in bhiwandi
ठाणे: भीषण अपघातात चार ठार


मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीतील माणकोलीजवळ आज भरधाव एसयूव्ही कार आणि ठाणे परिवहन सेवेच्या बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये सहा जण होते त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील अन्य जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसयूव्ही कारच्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून कार थेट टीमटी बसला आदळली आणि हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतांची नावे:

१) विक्रांत अरुणकुमार सिंग (वय-२४, सी/४१०, आंध्रा बँकेजवळ, रोड नं. ४, डोंबिवली)
२) नीरज कमलेश पांचाळ (वय-२३, ए/६०१, महावीर दर्शन, गोकुळ कॉलेज, मिरारोड)
३) मिहीर अनिल उतेकर (वय-२३, कपिल सोसायटी, दुसरा मजला, शांतीनगर मिरारोड)
४) निरव कृष्णकांत मेहता (वय-२३, मेघमिलाप वाटीका, रो हाऊस नं. १९३, सुभाष गार्डन, जहांगीरपुरा, सूरत, गुजरात)

जखमींची नावे:

१) वैभव महेंद्र छेडा (वय-२४, जे.जे. रुग्णालय)
२) रमेश शामजी पटेल (वय-२२, जे.जे. रुग्णालय)
३) संतोष मिश्रा (वय-२४, समता रुग्णालय, डोंबिवली)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज