म. टा. वृत्तसेवा, कल्याण
बहिणीच्या लग्नात मिळालेली अहेराची रक्कम सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी दान करत व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या आबासाहेब शिबे यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. लग्नात बहिणीला अहेरात मिळालेल्या ३६००० रुपयांच्या रकमेचा धनादेश शिबे यांनी मुख्यमंत्र्याच्या हातात दिला आहे. हा धनादेश स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर ‘फिलिंग थँकफूल’चा मेसेज देत आबासाहेबाचे कौतुक केले.
अंबरनाथमधील रहिवासी असलेल्या आबासाहेब शिबे यांची बहीण सुवर्णा हिचे दोन महिन्यांपूर्वी सातारा इथे लग्न झाले. या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेतही त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा जलयुक्त शिवारचा संदेश त्यांनी दिला होता. तसेच लग्नात बहिणीला मिळणाऱ्या अहेराची रक्कम जलयुक्त शिवार योजनेसाठी देणार असल्याची तळटीपही त्यांनी या पत्रिकेतच दिली होती. यानंतर लग्नात सुवर्णाला ३६ हजार रुपये रोख रकमेचा अहेर प्राप्त झाला. या सर्व रकमेचा धनादेश काढत त्यांनी तो सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी आपणही काही देणे लागतो, या सामाजिक भावनेतून मुख्यमंत्र्याकडे देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मुख्यमंत्र्याची वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागली होती.
आठ दिवसांपूर्वी अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आबासाहेब यांना वेळ दिल्यानंतर शिबे यांनी मुख्यमंत्र्याची वर्षा निवास स्थानी भेट घेत हा आहेराच्या रकमेचा धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी या कार्याचे कौतुक करताना आबासाहेबाकडून धनादेश स्वीकारतानाचा फोटो फेसबुकवर अपलोड करत फिलिंग आँकफूल असे स्टेटस टाकले असून आबासाहेब शिबे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बहिणीच्या लग्नात मिळालेली अहेराची रक्कम सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी दान करत व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या आबासाहेब शिबे यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. लग्नात बहिणीला अहेरात मिळालेल्या ३६००० रुपयांच्या रकमेचा धनादेश शिबे यांनी मुख्यमंत्र्याच्या हातात दिला आहे. हा धनादेश स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर ‘फिलिंग थँकफूल’चा मेसेज देत आबासाहेबाचे कौतुक केले.
अंबरनाथमधील रहिवासी असलेल्या आबासाहेब शिबे यांची बहीण सुवर्णा हिचे दोन महिन्यांपूर्वी सातारा इथे लग्न झाले. या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेतही त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा जलयुक्त शिवारचा संदेश त्यांनी दिला होता. तसेच लग्नात बहिणीला मिळणाऱ्या अहेराची रक्कम जलयुक्त शिवार योजनेसाठी देणार असल्याची तळटीपही त्यांनी या पत्रिकेतच दिली होती. यानंतर लग्नात सुवर्णाला ३६ हजार रुपये रोख रकमेचा अहेर प्राप्त झाला. या सर्व रकमेचा धनादेश काढत त्यांनी तो सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी आपणही काही देणे लागतो, या सामाजिक भावनेतून मुख्यमंत्र्याकडे देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मुख्यमंत्र्याची वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागली होती.
आठ दिवसांपूर्वी अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आबासाहेब यांना वेळ दिल्यानंतर शिबे यांनी मुख्यमंत्र्याची वर्षा निवास स्थानी भेट घेत हा आहेराच्या रकमेचा धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी या कार्याचे कौतुक करताना आबासाहेबाकडून धनादेश स्वीकारतानाचा फोटो फेसबुकवर अपलोड करत फिलिंग आँकफूल असे स्टेटस टाकले असून आबासाहेब शिबे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.