shrikant.sawant@timesgroup.com
tweet@ShrikantMT
धुवांधार पावसाचे थैमान, पुराचे जलसंकट, महागलेली शाडूची माती, तुटपुंजे भांडवल, आकसलेला पतपुरवठा आणि घटलेली मागणी…... या कारणांमुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश विक्री केंद्रांमध्ये आणि गणपती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांना मंदीचे चटके जाणवू लागले आहेत. जून आणि जुलै महिन्यात चांगली विक्री नोंद झाली होती, परंतु त्यानंतर पडलेल्या पावसाने संपूर्ण व्यवसायावरच पाणी फिरवल्याचा अनुभव मूर्तीकार व्यक्त करत आहेत. गेल्या १५ दिवसांतील कारखान्यांतील मूर्तींची उचल मंदावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदर जेवढा व्यवसाय होईल, त्यावरच संपूर्ण वर्षाचे उत्पन्न अवलंबून आहे. जागतिक मंदीचे हे संकट मूर्तिकारांनाही सहन करावे लागत असून एकीकडे मूर्तींचे भाव २० ते २२ टक्क्यांपर्यंत वाढलेले असताना मागणी घटल्याने मंदीची दरी अधिक खोल होऊ लागली आहे.
गणेशोत्सव अवघ्या तोंडावर आला असून शेकडो मूर्तींची निर्मिती केलेले मूर्तिकार सध्या ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या १५ दिवस अगोदर होणाऱ्या विक्रीतून मोठ्या फायद्याचे गणित मूर्तीकार आखतात. परंतु यंदा सुरुवातीचा एक महिना वगळल्यास पावसाळा संपल्यानंतर १५ दिवसांमध्ये फारशी उचल कारखान्यातून झाली नसल्याचा अनुभव मूर्तिकार सांगत आहेत. पेणच्या मूर्ती कारखान्यानंतर कल्याणच्या कुंभारवाड्याची ओळख कलात्मक मूर्तींसाठी आहे. २५ ते ३० कारखाने या भागात असून शाडूच्या मातीच्या सर्वाधिक मूर्तींची विक्रीदेखील या भागात होते. परंतु यंदा या भागात मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट असल्याचे येथील मूर्तिकारांनी स्पष्ट केले आहे. दरवर्षी ५०० पेक्षा अधिक मूर्तींची विक्री करणारे नरेश कुंभार यांनी यंदाच्या विक्री परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. या भागातील मूर्तिकार प्रामुख्याने शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती करतात. परंतु त्यांच्या प्रयत्नांना घटलेल्या मागणीमुळे मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर परिसरामध्ये सुमारे ६४० मूर्तिकारांच्या गणेशमूर्तीकार सेवा संस्थेने या मंदीविषयी चिंता व्यक्त केली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मूर्तिकारांना सरकारने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. केवळ खारखान्यातीलच नव्हे तर ऑनलाइन मूर्तीविक्रीवरही यंदा मंदीचे सावट जाणवत असल्याचे मंगलमूर्ती डॉटकॉम वेबसाइटचे निर्माते महेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.
लांबलेल्या पावसामुळे मूर्तीनिर्मितीच्या कामाला मोठा फटका सहन करावा लागला. मूर्ती सुकण्यास उशीर झाला असून रंगकामासही उशीर झाला आहे. त्यामुळे किंमतींमध्ये वाढ झाली असून एक हजार ते दहा ते १२ हजारांपर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २० ते २२ टक्क्यांनी मूर्ती महागल्या आहेत.
नरेश चव्हाण, मूर्तिकार
नागरिकांमध्ये चांगली जागरुकता आली असून शाडूच्या मातीच्या मूर्तींची विक्री वाढत असल्याने यंदा आम्ही शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. परंतु पावसामुळे आमच्या कारखान्यापर्यंत येण्याऐवजी जवळच्या केंद्रातून पीओपीच्या मूर्ती खरेदीला प्राधान्य दिल्याने आमची विक्री घटण्याची शक्यता आहे.
निखील म्हात्रे, मूर्तिकार
कोल्हापूर, सांगली, सातारा, तळकोकणात मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरासाठी गणेशोत्सव मंडळांनी मोठी मदत उभारली आहे. त्यामुळे यंदा उत्सवावरील खर्च कमी करण्यात आला असून मूर्तींवरील खर्चही कमी केल्याचे जाणवत आहे. दरवर्षी सात फुटांची मूर्ती खरेदी करणारे यंदा पाच किंवा त्यापेक्षा कमी उंचीची मूर्ती खरेदी करत आहेत.
नरेश कुंभार, सरचिटणीस, मूर्तिकार सेवा संस्था, कल्याण
tweet@ShrikantMT
धुवांधार पावसाचे थैमान, पुराचे जलसंकट, महागलेली शाडूची माती, तुटपुंजे भांडवल, आकसलेला पतपुरवठा आणि घटलेली मागणी…... या कारणांमुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश विक्री केंद्रांमध्ये आणि गणपती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांना मंदीचे चटके जाणवू लागले आहेत. जून आणि जुलै महिन्यात चांगली विक्री नोंद झाली होती, परंतु त्यानंतर पडलेल्या पावसाने संपूर्ण व्यवसायावरच पाणी फिरवल्याचा अनुभव मूर्तीकार व्यक्त करत आहेत. गेल्या १५ दिवसांतील कारखान्यांतील मूर्तींची उचल मंदावली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदर जेवढा व्यवसाय होईल, त्यावरच संपूर्ण वर्षाचे उत्पन्न अवलंबून आहे. जागतिक मंदीचे हे संकट मूर्तिकारांनाही सहन करावे लागत असून एकीकडे मूर्तींचे भाव २० ते २२ टक्क्यांपर्यंत वाढलेले असताना मागणी घटल्याने मंदीची दरी अधिक खोल होऊ लागली आहे.
गणेशोत्सव अवघ्या तोंडावर आला असून शेकडो मूर्तींची निर्मिती केलेले मूर्तिकार सध्या ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या १५ दिवस अगोदर होणाऱ्या विक्रीतून मोठ्या फायद्याचे गणित मूर्तीकार आखतात. परंतु यंदा सुरुवातीचा एक महिना वगळल्यास पावसाळा संपल्यानंतर १५ दिवसांमध्ये फारशी उचल कारखान्यातून झाली नसल्याचा अनुभव मूर्तिकार सांगत आहेत. पेणच्या मूर्ती कारखान्यानंतर कल्याणच्या कुंभारवाड्याची ओळख कलात्मक मूर्तींसाठी आहे. २५ ते ३० कारखाने या भागात असून शाडूच्या मातीच्या सर्वाधिक मूर्तींची विक्रीदेखील या भागात होते. परंतु यंदा या भागात मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट असल्याचे येथील मूर्तिकारांनी स्पष्ट केले आहे. दरवर्षी ५०० पेक्षा अधिक मूर्तींची विक्री करणारे नरेश कुंभार यांनी यंदाच्या विक्री परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. या भागातील मूर्तिकार प्रामुख्याने शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती करतात. परंतु त्यांच्या प्रयत्नांना घटलेल्या मागणीमुळे मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर परिसरामध्ये सुमारे ६४० मूर्तिकारांच्या गणेशमूर्तीकार सेवा संस्थेने या मंदीविषयी चिंता व्यक्त केली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मूर्तिकारांना सरकारने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. केवळ खारखान्यातीलच नव्हे तर ऑनलाइन मूर्तीविक्रीवरही यंदा मंदीचे सावट जाणवत असल्याचे मंगलमूर्ती डॉटकॉम वेबसाइटचे निर्माते महेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.
लांबलेल्या पावसामुळे मूर्तीनिर्मितीच्या कामाला मोठा फटका सहन करावा लागला. मूर्ती सुकण्यास उशीर झाला असून रंगकामासही उशीर झाला आहे. त्यामुळे किंमतींमध्ये वाढ झाली असून एक हजार ते दहा ते १२ हजारांपर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २० ते २२ टक्क्यांनी मूर्ती महागल्या आहेत.
नरेश चव्हाण, मूर्तिकार
नागरिकांमध्ये चांगली जागरुकता आली असून शाडूच्या मातीच्या मूर्तींची विक्री वाढत असल्याने यंदा आम्ही शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. परंतु पावसामुळे आमच्या कारखान्यापर्यंत येण्याऐवजी जवळच्या केंद्रातून पीओपीच्या मूर्ती खरेदीला प्राधान्य दिल्याने आमची विक्री घटण्याची शक्यता आहे.
निखील म्हात्रे, मूर्तिकार
कोल्हापूर, सांगली, सातारा, तळकोकणात मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरासाठी गणेशोत्सव मंडळांनी मोठी मदत उभारली आहे. त्यामुळे यंदा उत्सवावरील खर्च कमी करण्यात आला असून मूर्तींवरील खर्चही कमी केल्याचे जाणवत आहे. दरवर्षी सात फुटांची मूर्ती खरेदी करणारे यंदा पाच किंवा त्यापेक्षा कमी उंचीची मूर्ती खरेदी करत आहेत.
नरेश कुंभार, सरचिटणीस, मूर्तिकार सेवा संस्था, कल्याण