म. टा. वृत्तसेवा, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या कायम असून नियमित कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी तीन ते चार दिवस कचरावाहक वाहने फिरकत नसल्यामुळे पावसाचे पाणी या कचऱ्यावर पडून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील आंबिवलीसह अनेक भागांत मुख्य रस्त्यालगत असलेल्या कचराकुंडीभोवताली कचऱ्याचा ढीग साचला असून अनेक दिवसांपासून हा कचरा उचलला जात नसल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. दोन ते तीन दिवस घंटागाडी फिरकतच नसल्यामुळे परिसरात या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून पावसाच्या पाण्यासह हा कचरा रस्त्यावर वाहून येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळेच स्थानिक नगरसेविका शीतल गायकवाड यांनी प्रभागाच्या स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेचे अधिकारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला आहे.
कचरा उचलण्यासाठी दरवर्षी महापालिका लाखो रुपये खर्च करते. मात्र घनकचरा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे साचलेला कचरा उचलला जात नाही. यामुळेच ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून या कचऱ्यावर फिरणाऱ्या माशा, डास यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
याबाबत पालिकेच्या घनकचरा विभागाकडे तक्रारी केल्यानंतर कामगार कमी असल्याचे कारण दिले जाते. तसेच, कचराडेपोत कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करून परत येण्यास बराच कालावधी लागत आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या गाड्या अनेक तास रांगेत उभ्या ठेवाव्या लागत असल्यामुळे इतर काळात चार फेऱ्या मारणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या पावसाळ्यात कशाबशा दोन फेऱ्या मारू शकत असल्यामुळे ही समस्या वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या कायम असून नियमित कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी तीन ते चार दिवस कचरावाहक वाहने फिरकत नसल्यामुळे पावसाचे पाणी या कचऱ्यावर पडून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील आंबिवलीसह अनेक भागांत मुख्य रस्त्यालगत असलेल्या कचराकुंडीभोवताली कचऱ्याचा ढीग साचला असून अनेक दिवसांपासून हा कचरा उचलला जात नसल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. दोन ते तीन दिवस घंटागाडी फिरकतच नसल्यामुळे परिसरात या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून पावसाच्या पाण्यासह हा कचरा रस्त्यावर वाहून येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळेच स्थानिक नगरसेविका शीतल गायकवाड यांनी प्रभागाच्या स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेचे अधिकारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला आहे.
कचरा उचलण्यासाठी दरवर्षी महापालिका लाखो रुपये खर्च करते. मात्र घनकचरा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे साचलेला कचरा उचलला जात नाही. यामुळेच ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून या कचऱ्यावर फिरणाऱ्या माशा, डास यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
याबाबत पालिकेच्या घनकचरा विभागाकडे तक्रारी केल्यानंतर कामगार कमी असल्याचे कारण दिले जाते. तसेच, कचराडेपोत कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करून परत येण्यास बराच कालावधी लागत आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या गाड्या अनेक तास रांगेत उभ्या ठेवाव्या लागत असल्यामुळे इतर काळात चार फेऱ्या मारणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या पावसाळ्यात कशाबशा दोन फेऱ्या मारू शकत असल्यामुळे ही समस्या वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.