वसई : वसई तालुक्यातील गौरी आणि गणपतींना शनिवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जन ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने सोहळा शांततेत पार पडला. विसर्जनासाठी भाविकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. टाळ- मृदुंग वाजवत पारंपरिक आरत्या म्हणत बाप्पाची आणि गौरीची विसर्जन मिरवणूक काढली. घरगुती ६ हजार ५६२ गणपतींसह वसई -विरार शहर उपनगरातील सार्वजनिक १८२ गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यानिमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या तलावांच्या ठिकाणी महापालिका प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. शनिवारी दुपारनंतर घरगुती विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली.
वसईतही गौरीगणपतींना भावपूर्ण निरोप
वसई तालुक्यातील गौरी आणि गणपतींना शनिवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जन ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने सोहळा शांततेत पार पडला. विसर्जनासाठी भाविकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती.
Maharashtra Times 9 Sep 2019, 1:20 am