म. टा. वृत्तसेवा, शहापूर
शहापूर तालुक्यातील चोंढे येथील घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती तांत्रिक बिघाडामुळे आणि हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी जपानी तंत्रज्ञ अजूनही न आल्याने गेल्या ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकल्पाची २५० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.
शहापूर तालुक्यात हा घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. जपान व भारत यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या, संपूर्ण आरसीसी तंत्राचा वापर करून बांधण्यात आलेल्या या जलविद्युत प्रकल्पातून पाणी खेचण्यासाठी लागणाऱ्या ऑप्टिक पॉवर पद्धतीने २५० मेगावॉट वीजनिर्मिती होते. येथून दोन लाख ५० हजार युनिट म्हणजेच २५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. २८ जुलै रोजी प्रकल्पाच्या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांत तांत्रिक बिघाड झाल्याने येथील वीजनिर्मिती संपूर्णपणे बंद आहे. जपानच्या मदतीने बनवलेल्या या वीज जनित्रात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी जपानी तंत्रज्ञांची गरज असल्याने ते उपलब्ध झाल्याशिवाय विद्युत पुरवठा पूर्ववत होणार नसल्याचे समजते.
या संदर्भात राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. सरकारकडून आर्थिक तरतूद मंजूर होताच जपानी तंत्रज्ञांना बोलावून बिघाड दुरुस्त केला जाईल.
- व्ही. एल. वेरुळकर,
एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर, घाटघर
शहापूर तालुक्यातील चोंढे येथील घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती तांत्रिक बिघाडामुळे आणि हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी जपानी तंत्रज्ञ अजूनही न आल्याने गेल्या ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकल्पाची २५० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.
शहापूर तालुक्यात हा घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. जपान व भारत यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या, संपूर्ण आरसीसी तंत्राचा वापर करून बांधण्यात आलेल्या या जलविद्युत प्रकल्पातून पाणी खेचण्यासाठी लागणाऱ्या ऑप्टिक पॉवर पद्धतीने २५० मेगावॉट वीजनिर्मिती होते. येथून दोन लाख ५० हजार युनिट म्हणजेच २५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. २८ जुलै रोजी प्रकल्पाच्या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांत तांत्रिक बिघाड झाल्याने येथील वीजनिर्मिती संपूर्णपणे बंद आहे. जपानच्या मदतीने बनवलेल्या या वीज जनित्रात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी जपानी तंत्रज्ञांची गरज असल्याने ते उपलब्ध झाल्याशिवाय विद्युत पुरवठा पूर्ववत होणार नसल्याचे समजते.
या संदर्भात राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. सरकारकडून आर्थिक तरतूद मंजूर होताच जपानी तंत्रज्ञांना बोलावून बिघाड दुरुस्त केला जाईल.
- व्ही. एल. वेरुळकर,
एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर, घाटघर