अ‍ॅपशहर

शाळेत पाच वर्षे विनासुट्टी उपस्थित!

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या विद्यार्थिनीने शालेय उपस्थितीत राज्यात पहिला व देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.ययातीने सहावीची परीक्षा दिली असून ती इयत्ता दुसरी ते सहावीपर्यंत सलग पाच वर्षे १०० टक्के उपस्थित होती.

Maharashtra Times 19 Apr 2017, 12:11 pm
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girl students presnt in school without a holiday
शाळेत पाच वर्षे विनासुट्टी उपस्थित!


पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या विद्यार्थिनीने शालेय उपस्थितीत राज्यात पहिला व देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.ययातीने सहावीची परीक्षा दिली असून ती इयत्ता दुसरी ते सहावीपर्यंत सलग पाच वर्षे १०० टक्के उपस्थित होती. ययातीचे पूर्व प्राथमिक शिक्षण डहाणू नगरपालिका क्षेत्रातील पारनाका जवळील न्यू एज्युकेशन ट्रस्ट येथे झाले आहे. या काळात तिने दररोज १६ किमीचा प्रवास खाजगी वाहनातून केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात प्रवेश घेतला. तेथेही पाचवी व सहावीमध्ये ती वर्षभर उपस्थित राहिली. गेल्या वर्षी डहाणू तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. काही दिवस पूरस्थितीही होती. मात्र या वेळी वडिलांनी तिला दुचाकीवर शाळेत सोडले. अभ्यासाप्रमाणेच संस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा आणि खेळातही ती आघाडीवर आहे. पहाटे उठून व्यायाम, योगासने, गृहपाठ, अवांतर वाचन, टीव्ही पाहणे आणि खेळणे हा तिचा दिनक्रम आहे. तिच्या आईवडिलांनी बीपीएडपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

दरम्यान इंटरनेटच्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन स्कूल या साइटला भेट दिल्यानंतर आपल्या पाल्याने नकळत एका विक्रमाची नोंद केल्याचे वडील शैलेन्द्र यांच्या लक्षात आले. भोपाळच्या मानसी दास या नववीतील विद्यार्थिनीने सलग नऊ वर्ष १०० टक्के उपस्थित राहाण्याचा विक्रम केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज