अ‍ॅपशहर

पुरामुळे घटली बकऱ्यांची आवक

२६ जुलै आणि ४ ऑगस्टच्या पुराचा फटका कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराला बसला आहे. यामुळे राज्यातून व राज्याबाहेरून येणाऱ्या बकऱ्यांची आवक घटली असून, परिणामी बकऱ्यांचे भाव वाढले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2019, 5:00 pm
कल्याण : २६ जुलै आणि ४ ऑगस्टच्या पुराचा फटका कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराला बसला आहे. यामुळे राज्यातून व राज्याबाहेरून येणाऱ्या बकऱ्यांची आवक घटली असून, परिणामी बकऱ्यांचे भाव वाढले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goat arrives due to floods
पुरामुळे घटली बकऱ्यांची आवक


कल्याण कृषीउत्पन्न बाजार समितीत जनावरांचा बाजार भरतो. बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणारे बोकड खरेदी केले जातात. राज्याला पुराने झोडपले असल्याने राज्यातून व राज्याबाहेरून येणाऱ्या बकऱ्यांची आवक घटली आहे. दरवर्षी बकरी ईदनिमित्त १० हजार बकरे येतात. यंदा तीन हजार बकरेच बाजारात विक्रीसाठी आले आहेत. आवक घटल्याने अर्थातच कुर्बानीच्या बकऱ्यांचा भाव वाढला आहे. बाजारात एक बोकड १० ते ३५ हजारांना विकला जात आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातून येणारे बोकड पुरामुळे बाजारात आलेले नाहीत. राज्यातील काही भागांतून बोकड विक्रीसाठी आले आहेत. रस्ते वाहतुकीस पुराचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी बकरे अडकून पडले आहेत. मात्र तरीसुद्धा महाग असलेला बोकड खरेदी करून कुर्बानीची तयारी केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज