म. टा. प्रतिनिधी, ठाणे
डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर स्वतः रस्त्यावर उतरल्यावर मंगळवारी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न दिसून आले. स्टेशन परिसराला पुन्हा फेरीवाल्यांचा गराडा पडल्याने पादचाऱ्यांना धड वाटही काढता येत नव्हती. त्यामुळे आता प्रशासनापाठोपाठ महापौरांचादेखील धाक फेरीवाल्यांना राहिलेला नाही हेच स्पष्ट होत आहे.
स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून युवा सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाकडून फेरीवाले हटत नसल्याने शिवसैनिकच आता दररोज ही कारवाई करतील, असे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी जाहीर केले होते. या कारवाईनंतर फेरीवाल्यांनी शिवसैनिकांविरोधात पोलिसांकडे धाव घेत आक्रमक पवित्रा घेतला होता.
डोंबिवलीचे शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसैनिकांनी फेरीवाले हटवले होते. या कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा फेरीवाल्यांनी ही जागा बळकावली. त्यामुळे महापौर देवळेकरच सोमवारी डोंबिवली स्टेशन परिसरात दाखल झाले व त्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करणे प्रशासनाला भाग पाडले. पण मंगळवारी फेरीवाल्यांनी संध्याकाळी पुन्हा एकदा या परिसरात बस्तान बसवल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौरांची मात्रादेखील फेरीवाल्यांना लागू पडत नसल्याची बोचरी टीका विरोधकांनी केली आहे.
डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर स्वतः रस्त्यावर उतरल्यावर मंगळवारी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न दिसून आले. स्टेशन परिसराला पुन्हा फेरीवाल्यांचा गराडा पडल्याने पादचाऱ्यांना धड वाटही काढता येत नव्हती. त्यामुळे आता प्रशासनापाठोपाठ महापौरांचादेखील धाक फेरीवाल्यांना राहिलेला नाही हेच स्पष्ट होत आहे.
स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून युवा सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाकडून फेरीवाले हटत नसल्याने शिवसैनिकच आता दररोज ही कारवाई करतील, असे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी जाहीर केले होते. या कारवाईनंतर फेरीवाल्यांनी शिवसैनिकांविरोधात पोलिसांकडे धाव घेत आक्रमक पवित्रा घेतला होता.
डोंबिवलीचे शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसैनिकांनी फेरीवाले हटवले होते. या कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा फेरीवाल्यांनी ही जागा बळकावली. त्यामुळे महापौर देवळेकरच सोमवारी डोंबिवली स्टेशन परिसरात दाखल झाले व त्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करणे प्रशासनाला भाग पाडले. पण मंगळवारी फेरीवाल्यांनी संध्याकाळी पुन्हा एकदा या परिसरात बस्तान बसवल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौरांची मात्रादेखील फेरीवाल्यांना लागू पडत नसल्याची बोचरी टीका विरोधकांनी केली आहे.