नरेंद्र पाटील । पालघर
पालघर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसानं धुमाकूळ घातला असून पावसामुळं समुद्र किनाऱ्यावरील गावांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या केळवे परिसरातही घरं व हॉटेलांची हानी झाली असून त्यामुळं पर्यटनाला फटका बसला आहे.
केळवे येथील अनेक हॉटेलांचे पत्रे वादळानं उडून गेले आहेत. त्याचबरोबर तेथील किनाऱ्यावरील सुरुच्या बागेतील झाडे उन्मळून पडली असून बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळं किनाऱ्यांची रयाच गेली आहे. जिल्ह्यात अनेक गावांतील घरामधे पाणी शिरलं आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी वादळ सुरूच असल्यानं घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. पश्चिम रेल्वेने डहाणू-विरारसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत.
डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं काल सायंकाळी मुंबईहून गुजरात व दिल्लीकडं जाणाऱ्या गाड्या तब्बल तीन तास विविध रेल्वे स्थानकांत अडकून पडल्या होत्या. रेल्वेच्या सर्वच स्थानकांमध्ये पाणी तुंबल्यामुळं आजही वाहतूक खूपच मंदावली आहे.
पालघर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसानं धुमाकूळ घातला असून पावसामुळं समुद्र किनाऱ्यावरील गावांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या केळवे परिसरातही घरं व हॉटेलांची हानी झाली असून त्यामुळं पर्यटनाला फटका बसला आहे.
केळवे येथील अनेक हॉटेलांचे पत्रे वादळानं उडून गेले आहेत. त्याचबरोबर तेथील किनाऱ्यावरील सुरुच्या बागेतील झाडे उन्मळून पडली असून बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळं किनाऱ्यांची रयाच गेली आहे. जिल्ह्यात अनेक गावांतील घरामधे पाणी शिरलं आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी वादळ सुरूच असल्यानं घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. पश्चिम रेल्वेने डहाणू-विरारसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत.
डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं काल सायंकाळी मुंबईहून गुजरात व दिल्लीकडं जाणाऱ्या गाड्या तब्बल तीन तास विविध रेल्वे स्थानकांत अडकून पडल्या होत्या. रेल्वेच्या सर्वच स्थानकांमध्ये पाणी तुंबल्यामुळं आजही वाहतूक खूपच मंदावली आहे.