वसई : केरळ येथील पूरग्रस्थ नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत भाजपचे वसई रोड मंडळ अध्यक्ष उत्तमकुमार यांनी काही संस्था तसेच कार्यकर्त्यांच्या मदतीने मदत गोळा केली. जवळपास ५ टन वजनाच्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, दैनंदिन वापरातील सामान, कपडे असे सामान भरून खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत ट्रक केरळकडे रवाना करण्यात आला. या सर्व वस्तूचे वितरण केरळच्या नागरिकांना करण्यासाठी तेथे स्वतः केरळला गेले आहेत.
साहित्य चावडीवर विनोदी भूमिका
विरारच्या यंगस्टार्स ट्रस्टतर्फे दर महिन्याला होणाऱ्या 'साहित्य चावडी'वर 'बालगंधर्व ते दिलिप प्रभावळकर' हा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. विनोदी चित्रपट अभिनेते विजय चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोणत्याही एका नाटकाचा अभिनय सादरीकरण करता येऊ शकणार आहे. प्रत्येकास ८ ते १० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. मंगलमूर्ती मंदिर, वाय. के. नगर, विरार पश्चिम येथे सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सहभागी होण्यासाठी संपर्क : विजय उमर्जी : ०७३५०३५०२१५. सर्व नाट्य रसिकश्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक अजीव पाटील यांनी केले आहे.