पालघर : भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात१२ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पूरस्थिती निर्माण होण्ण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रण सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सर्व सूचनांचे पालन करून प्रशसनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. जोराचा पाऊस असल्यास किंवा नदीनाले, खाड्या, रस्यावरील पूल, साकव अशा ठिकाणी पूरपरिस्थती निर्माण झाल्यास अशा ठिकाणी जाणे टाळावे, अशी सूचना त्यांनी केली.
अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात१२ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पूरस्थिती निर्माण होण्ण्याची शक्यता आहे...
Maharashtra Times 9 Jul 2018, 4:00 am