अ‍ॅपशहर

गळफास घेऊन बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

येथील कॅम्प नंबर तीन परिसरात राहणाऱ्या आणि नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयेश पवार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

Maharashtra Times 14 Jun 2018, 2:37 am
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hsc student suicide
गळफास घेऊन बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या


येथील कॅम्प नंबर तीन परिसरात राहणाऱ्या आणि नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयेश पवार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

उल्हासनगर येथील कॅम्प नंबर तीन परिसरातील महात्मा जोतिबा फुले नगर परिसरात जयेश पवार (१७) हा विद्यार्थी राहत होता. जयेशचे वडील संजय पवार हे उल्हासनगर महापालिकेत काम करत असून त्याची आई एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. आठवड्यापूर्वी लागलेल्या बारावीच्या निकालात जयेश उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता. मंगळवारी सकाळी जयेशचे आई-वडील सकाळी कामाला गेले असता, तो घरी एकटाच होता. यावेळी त्याने घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. संध्याकाळी त्याचे आई-वडील घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. जयेशने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जयेशच्या या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या प्रकरणी सेन्ट्रल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज