म. टा. वृत्तसेवा, कल्याण
घरात अन्नाचा दाणा नाही, त्यातच दिवाळी तोंडावर आलेली, त्यामुळे जगणे असह्य झालेल्या महिलेने आपल्या तीन मुलांसह विष पिऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी मोहने येथील कातकरी पाड्यावर घडली आहे. यात महिलेसह दोन मुलांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या मुलावर कळवा येथील शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष्मी प्रदीप वाघे (२५) असे या महिलेचे नाव आहे.
प्रदीप वाघे त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी नाजूका (१०), मुलगा वंश (७) व विशाल (१२) यांच्यासह पाड्यावर राहत होते. मासेमारी करून प्रदीप कुटुंबाचा उदारनिर्वाहा करत. गेल्या चार दिवसांपासून प्रदीपने घरात पैसे न आणल्याने लक्ष्मी त्रस्त होती. घरात खाण्यासाठी अन्न आणि दिवाळीच्या तयारीसाठी पैसे नसल्याने लक्ष्मी आणि प्रदीपमध्ये पहाटे ५.३० वाजता कडाक्याचे भांडण झाले. संतापलेला प्रदीप घरातून बाहेर पडल्यावर लक्ष्मीने हे टोकाचे पाऊल उचलले. प्रदीप घरी परतेपर्यंत फार उशीर झाला होता. प्रदीपने आरडाओरडा करून शेजाऱ्यांच्या मदतीने चौघांनाही रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरानी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले तर एका मुलाला उपचारासाठी तातडीने कळवा रुग्णालयात पाठवले. त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
अंत्योदय योजनेची करणार चौकशी
आदिवासी बांधवांना दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी शासनाने अंत्योदय योजनेतून शिधावाटप केंद्रांत धान्य पुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. मात्र, या आदिवासींकडे ना रेशनकार्ड असते, ना पैसे मग त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार, असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थति केला.
शहरी आदिवासींचे जगणे कठीण झाले आहे. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडते आहे. लक्ष्मी आणि तिच्या दोन मुलाचा मृत्यू ‘भूकबळी’ असून या घटनेला सरकार जबाबदार आहे.- विवेक पंडित, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना
घरात अन्नाचा दाणा नाही, त्यातच दिवाळी तोंडावर आलेली, त्यामुळे जगणे असह्य झालेल्या महिलेने आपल्या तीन मुलांसह विष पिऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी मोहने येथील कातकरी पाड्यावर घडली आहे. यात महिलेसह दोन मुलांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या मुलावर कळवा येथील शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष्मी प्रदीप वाघे (२५) असे या महिलेचे नाव आहे.
प्रदीप वाघे त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी नाजूका (१०), मुलगा वंश (७) व विशाल (१२) यांच्यासह पाड्यावर राहत होते. मासेमारी करून प्रदीप कुटुंबाचा उदारनिर्वाहा करत. गेल्या चार दिवसांपासून प्रदीपने घरात पैसे न आणल्याने लक्ष्मी त्रस्त होती. घरात खाण्यासाठी अन्न आणि दिवाळीच्या तयारीसाठी पैसे नसल्याने लक्ष्मी आणि प्रदीपमध्ये पहाटे ५.३० वाजता कडाक्याचे भांडण झाले. संतापलेला प्रदीप घरातून बाहेर पडल्यावर लक्ष्मीने हे टोकाचे पाऊल उचलले. प्रदीप घरी परतेपर्यंत फार उशीर झाला होता. प्रदीपने आरडाओरडा करून शेजाऱ्यांच्या मदतीने चौघांनाही रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरानी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले तर एका मुलाला उपचारासाठी तातडीने कळवा रुग्णालयात पाठवले. त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
अंत्योदय योजनेची करणार चौकशी
आदिवासी बांधवांना दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी शासनाने अंत्योदय योजनेतून शिधावाटप केंद्रांत धान्य पुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. मात्र, या आदिवासींकडे ना रेशनकार्ड असते, ना पैसे मग त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार, असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थति केला.
शहरी आदिवासींचे जगणे कठीण झाले आहे. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडते आहे. लक्ष्मी आणि तिच्या दोन मुलाचा मृत्यू ‘भूकबळी’ असून या घटनेला सरकार जबाबदार आहे.- विवेक पंडित, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना